शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अमरावतीत भाजीपाल्याला संचारबंदीचा फटका; कोथिंबीर २५०, टोमॅटो १५० रूपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 07:10 IST

Amravati News गत चार दिवसांपासून शहरात संचारबंदी आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, दैनंदिन व्यवहारात मोठा परिणाम झाला आहे. मात्र, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

गृहिणींचे बजेट कोलमडले, , बाजार समिती बंद

अमरावती : गत चार दिवसांपासून शहरात संचारबंदी आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, दैनंदिन व्यवहारात मोठा परिणाम झाला आहे. मात्र, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. रोजगार नसल्याने गरीब, सामान्यांचे हाल होत आहे. हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी दिनचर्या असलेल्यांचे जगणे कठीण झाले आहे.

अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत संचारबंदी आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला कुलूप लागले आहे. बाहेरील माल वाहतूक ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला, फळांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर झाला आहे. गत चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यातून भाजीपाला शहरात विक्रीसाठी आलेला नाही. केवळ शहरानजीकच्या भागातून थोडाफार भाजीपाला कसाबसा घाऊक विक्रेते आणत असल्याचे वास्तव आहे. मात्र, मागणी जास्त आणि आवक कमी अशी भाजीपाल्याची वस्तुस्थिती आहे. गत चार दिवसातच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, डाळी वापराकडे गृहिणींचा कल वाढला आहे. भाजीच्या फोडणीसाठी लागणारी कोथिंबीर २५० रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे गरीब, सामान्यांच्या आवाक्याबाहेर भाजीपाला गेला आहे.

शहराच्या सीमेवर कडक तपासणी

शहराच्या सीमेवर कडक तपासणी सुरू आहे. त्यामुळे बाहेरून कोणताही माल, साहित्य आणता येणे शक्य नाही. शहरात जो काही भाजीपाला विक्रीसाठी आणला जात आहे, तो नजीकच्या ग्रामीण भागात उत्पादित होणारा आहे. तो देखील विक्रेते जीवावर उदार होऊन विक्रीसाठी आणत आहे. शहराच्या चारही बाजू सीमा पोलिसांनी वेढल्या आहेत. वाहने असो वा, व्यक्ती या सर्वांची तपासणी केली जात आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांवर ‘खाकी’ बरसत असल्याने बाहेर नको रे बाबा असे म्हणत अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे.

असे आहे भाजीपाल्याचे प्रति किलो दर

टोमॅटो - १५०

बटाटे- ४०

वांगी -६०

भेंडी- ७०

तुरई - ६०

भेंडी- ८०

लवकी - ६०

कोथिंबीर- २५०

मिरची - १००

पालक - ८०

ढेमसे-६०

फुल कोबी- ८०

गवार - १२०

लसूण - १२०

गॅस सिलिंडर पावतीविना

संचारबंदीत इंटरनेट बंद आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्य वापराचे गॅस सिलिंडर आता पावतीविना दिले जात आहे. पैसे देऊनही गॅसची रक्कम किती?, हे हल्ली गृहिणींना कळेनासे झाले आहे. इंटरनेट बंदीमुळे अनेक व्यवहारांना फटका बसत आहे. मोबाईल केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. संचारबंदीत गॅस सिलिंडर चढ्या दराने विकल्या जात असल्याची ओरड आहे.

भाजीपाला खरेदी करावा की नाही?, अशी स्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदी, इंटरनेट बंदीमुळे अनेक कुटुंबांचे नियोजन बिघडले आहे. जीवनावश्यक वस्तू, साहित्याचे दर वधारले आहे. आता संचारबंदी उठवून पूर्वपदावर स्थिती यायला हवी.

- प्रतिभा चव्हाण, गृहिणी.

बाजार समिती बंद आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी कसा, कोठून आणावा, हा गंभीर प्रश्न आहे. रोजगार मिळविण्यासाठी नजीकच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांकडून भाजीपाला कसातरी विक्रीसाठी आणावा लागत आहे.

भाऊराव बोरकर, भाजीपाला विक्रेते

टॅग्स :vegetableभाज्या