शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भाजीपाला, फळ उत्पादकांना लाॅकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

मोर्शी : स्थानिक शेतकरी घेत असलेल्या बागायती पिके, फळे, भाजीपाला विक्रीकरिता कोरोना लॉकडाऊनमध्ये बाजार समितीच्या माध्यमातून विक्रीस परवानगी मिळावी, ...

मोर्शी : स्थानिक शेतकरी घेत असलेल्या बागायती पिके, फळे, भाजीपाला विक्रीकरिता कोरोना लॉकडाऊनमध्ये बाजार समितीच्या माध्यमातून विक्रीस परवानगी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी केली.

मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी, नेरपिंगळाईसह तालुक्यातील बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला जोड म्हणून एका वर्षात तीन पिके घेण्याचे नियोजन केले आहे.

उन्हाळ्याच्या मोसमात भाजीपालासोबतच, एरवी नदी पात्रात घेतल्या जाणाऱ्या टरबूज, खरबूजची लागवड स्वतःच्या शेतात करून उत्पन्नवाढीचे प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि फळविक्रीची दुकाने आणि बाजार समितीसुद्धा बंद ठेवण्यात आली. पर्यायाने शेतातील भाजीपाल्याची तोड थांबली. विशिष्ट कालावधीत तोड करून ती बाजारात विक्रीस आणल्यास शेतकऱ्यांना भाव मिळतो, शिवाय शेतातील झाडांवर पुन्हा फळ धरले जाते.

शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नियोजनसुद्धा उन्हाळी पिकावर अवलंबून असते. मात्र, सध्या कठोर लॉकडाऊनमुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाला, टरबूज, खरबूज तसेच पडून आहेत. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या प्रवर्गात भाजीपाला, स्थानिक उत्पादित टरबूज, खरबूजसारख्या फळांचा समावेश करून जिल्हाधिकाऱ्यांनी विक्रीकरिता बाजार समिती उपलब्ध करून द्यावी, फळ, भाजीपाला विक्रेत्यांना गल्लीत गाडीवर विक्रीस परवानगी देऊन शेतकऱ्याचे हित जोपासावे, अशी मागणी करण्यात आली आहे.