शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

डाळ, भाजीपाला महागच !

By admin | Updated: July 20, 2016 00:12 IST

पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे किचनचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे.

महागाई : भाववाढीने कोळमडले सर्वसामान्यांचे बजेटअमरावती : पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे किचनचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे. भाज्यांचा दराने प्रतिकिलो शंभरी गाठल्याने हेच का ते 'अच्छे दिन' अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहेत. डाळींच्या दरातही कोणतीही घट नसल्याने तूरडाळ सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाली आहे. मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला. जून महिना संपल्यानंतरदेखील पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली असून अद्यापही ही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात अद्यापपर्यंत मोठी दरवाढ कायम आहे. अमरावती शहरात नागपूर, नाशिक, औरंगाबाद व लगतच्या जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातूनही भाजीपाल्यांची आवक असते. परंतु ही आवक मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी झाल्यानेच भाजीपाल्याच्या दरात वाढत झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी सांगितले. आवकवर अवलंबून असलेला भाजीबाजार आता पुढील किमान महिनाभरासाठी तरी धोक्यात आहे. विशेष म्हणजे घाऊक आणि किरकोळ दरातही प्रचंड फरक आहे. कॉटन मार्केट, भाजी बाजारातून शहराच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर आजूबाजूच्या भागात किरकोळ भाजी विक्रेते येथून घाऊक दरात घेऊन जातात. पण जून व जुलै महिन्यात भाजी मंडईत भाजीपाल्यांची आवक कमी आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातून येणारी आवक रोडवल्याने बाहेरून भाजीपाला बोलवावे लागत आहे. मात्र यंदा बाहेरील भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात ४० ते ६० रुपये किलो असलेला सांभार सरसकट ४० रुपये पावाने विक्री होत आहे. १०० रुपये दिलेली मिरची ५० रुपये पावाने किंवा ३० रुपये किलोची भेंडी १५ रुपये पाव दराने विक्री होत आहे. केवळ काकडीचे दर बहुतांश प्रमाणात कमी आणि स्थिर आहे. (प्रतिनिधी)