शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

डाळ, भाजीपाला महागच !

By admin | Updated: July 20, 2016 00:12 IST

पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे किचनचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे.

महागाई : भाववाढीने कोळमडले सर्वसामान्यांचे बजेटअमरावती : पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे किचनचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे. भाज्यांचा दराने प्रतिकिलो शंभरी गाठल्याने हेच का ते 'अच्छे दिन' अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहेत. डाळींच्या दरातही कोणतीही घट नसल्याने तूरडाळ सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाली आहे. मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला. जून महिना संपल्यानंतरदेखील पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली असून अद्यापही ही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात अद्यापपर्यंत मोठी दरवाढ कायम आहे. अमरावती शहरात नागपूर, नाशिक, औरंगाबाद व लगतच्या जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातूनही भाजीपाल्यांची आवक असते. परंतु ही आवक मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी झाल्यानेच भाजीपाल्याच्या दरात वाढत झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी सांगितले. आवकवर अवलंबून असलेला भाजीबाजार आता पुढील किमान महिनाभरासाठी तरी धोक्यात आहे. विशेष म्हणजे घाऊक आणि किरकोळ दरातही प्रचंड फरक आहे. कॉटन मार्केट, भाजी बाजारातून शहराच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर आजूबाजूच्या भागात किरकोळ भाजी विक्रेते येथून घाऊक दरात घेऊन जातात. पण जून व जुलै महिन्यात भाजी मंडईत भाजीपाल्यांची आवक कमी आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातून येणारी आवक रोडवल्याने बाहेरून भाजीपाला बोलवावे लागत आहे. मात्र यंदा बाहेरील भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात ४० ते ६० रुपये किलो असलेला सांभार सरसकट ४० रुपये पावाने विक्री होत आहे. १०० रुपये दिलेली मिरची ५० रुपये पावाने किंवा ३० रुपये किलोची भेंडी १५ रुपये पाव दराने विक्री होत आहे. केवळ काकडीचे दर बहुतांश प्रमाणात कमी आणि स्थिर आहे. (प्रतिनिधी)