शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
4
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
5
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
6
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
7
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
8
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
9
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
10
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
12
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
13
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
14
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
15
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
16
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
17
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
18
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
19
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
20
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर

डाळ, भाजीपाला महागच !

By admin | Updated: July 20, 2016 00:12 IST

पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे किचनचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे.

महागाई : भाववाढीने कोळमडले सर्वसामान्यांचे बजेटअमरावती : पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे किचनचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे. भाज्यांचा दराने प्रतिकिलो शंभरी गाठल्याने हेच का ते 'अच्छे दिन' अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहेत. डाळींच्या दरातही कोणतीही घट नसल्याने तूरडाळ सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाली आहे. मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळ निर्माण झाला. जून महिना संपल्यानंतरदेखील पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली असून अद्यापही ही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात अद्यापपर्यंत मोठी दरवाढ कायम आहे. अमरावती शहरात नागपूर, नाशिक, औरंगाबाद व लगतच्या जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातूनही भाजीपाल्यांची आवक असते. परंतु ही आवक मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी झाल्यानेच भाजीपाल्याच्या दरात वाढत झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी सांगितले. आवकवर अवलंबून असलेला भाजीबाजार आता पुढील किमान महिनाभरासाठी तरी धोक्यात आहे. विशेष म्हणजे घाऊक आणि किरकोळ दरातही प्रचंड फरक आहे. कॉटन मार्केट, भाजी बाजारातून शहराच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर आजूबाजूच्या भागात किरकोळ भाजी विक्रेते येथून घाऊक दरात घेऊन जातात. पण जून व जुलै महिन्यात भाजी मंडईत भाजीपाल्यांची आवक कमी आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातून येणारी आवक रोडवल्याने बाहेरून भाजीपाला बोलवावे लागत आहे. मात्र यंदा बाहेरील भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात ४० ते ६० रुपये किलो असलेला सांभार सरसकट ४० रुपये पावाने विक्री होत आहे. १०० रुपये दिलेली मिरची ५० रुपये पावाने किंवा ३० रुपये किलोची भेंडी १५ रुपये पाव दराने विक्री होत आहे. केवळ काकडीचे दर बहुतांश प्रमाणात कमी आणि स्थिर आहे. (प्रतिनिधी)