शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

राज्यात अधिका-यांचे प्रमाणवाढीसाठी यूपीएससीत विशेष शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 16:13 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगा(यूपीएससी)मार्फत निवड होणा-या भारतीय प्रशासकीय सेवेत राज्यातील अधिका-यांचे प्रमाण वाढावे, यासाठी गुणवत्ताधारितांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)मार्फत निवड होणा-या भारतीय प्रशासकीय सेवेत राज्यातील अधिका-यांचे प्रमाण वाढावे, यासाठी गुणवत्ताधारितांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय प्रशासकीय सेवेत जाणा-या विद्यार्थ्यांना ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.देशात अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातून भारतीय प्रशासकीय सेवेत अधिका-यांची टक्केवारी अत्यल्प आहे. त्यामुळे राज्य शासनाने यूपीएससीमार्फत भारतीय प्रशासकीय सेवेत अधिका-यांचे राज्यातून प्रमाण वाढीस लागावे, यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा मानस होता. त्याअनुषंगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत फेरीपर्यंत पोहचणारे तथापि, अंतिमत: भारतीय प्रशासकीय सेवेत निवड न होणा-या होतकरू व गुणवंत उमेदवारांना दिल्ली येथील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची पूर्व तयारी करून घेणा-या नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. त्यानुसार गुणवत्ताधारितांना विशेष शिष्यवृत्ती योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी दिल्ली येथील श्रीराम आयएएस संस्थेला मान्यता प्रदान करण्यात आली आहे.सन २०१७-२०१८ या चालू वर्षांसाठी राज्य शासनाने ही संस्था करारबद्ध केली आहे. निकष, पात्रता, अटी व शर्ती गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजनेसाठी लागू राहील, ही बाब शासनाने स्पष्ट केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालकांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पात्र उमेदवारांना योजनेच्या लाभासाठी मुंबई येथे दूरध्वनी क्रमांक (०२२-२२०७०९४२) संपर्क साधण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उप सचिव रोहिणी भालेकर यांनी केले आहे.भारतीय प्रशासकीय सेवेत इतर राज्यांच्या अधिका-यांचाच ठसा दिसून येतो. त्यामुळे यूपीएससीत महाराष्ट्रातील अधिका-यांचे प्रमाण वाढीस लागावे, यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. याचा होतकरू, गुणवंत विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल.- विनोद तावडे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र