शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

अप्पर वर्धाचे पाणी महादेव प्रकल्पात नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:07 IST

जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. पालकमंत्री बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येईल.

ठळक मुद्देनदीजोड प्रकल्प राबविणार : पालकमंत्री अनिल बोंडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येणार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल. प्रारंभीच्या टप्प्यात अप्पर वर्धा प्रकल्पातील पाणी महादेव प्रकल्पात सोडण्यासाठी प्रकल्प जोड कार्यक्रम नावीन्यपूर्ण योजनेत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. पालकमंत्री बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येईल. पंढरी मध्यम प्रकल्पात क्रेस्ट लेव्हलपर्यंत २४ दलघमी पाणीसाठा क्षमता निर्मिती झालेली आहे. उर्वरित पाणीसाठा (६२.२९ दलघमी) मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पाइप डिस्ट्रिब्यूशनचे काम सुरू करण्यात आले आहे. पाक नदी प्रकल्प व चांदस लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ६ हजार ६१ शेतकरी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ३५ हजार २२६ अर्जांना पूर्वसंमती दिली आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांना ७६१ कोटी ३० लक्ष रुपये कर्जमाफी मिळाली आहे. जे शेतकरी हिरव्या यादीत आहेत, त्यांनी नावे व कर्ज लक्षात घेऊन शासनाकडून आवश्यक निधी मिळवून घ्यावा, असे आदेश बँकांना दिले आहेत. पुनर्गठणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या समावेशासाठी प्रयत्न होत आहेत. बँकांनाही निर्देश दिले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी सहायक निबंधक पातळीवर समिती केली आहे. पात्र शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.कृषी यांत्रिकीकरणाला बळकृषी यांत्रिकीकरण योजनेत वैयक्तिक अनुदान मिळतेच; पण बचतगट वा शेतकरी कंपनीला अवजार, ट्रॅक्टर आदींसाठी बँकेमार्फत ६० टक्के अनुदान देण्यात येत आहे. यंदा ४७ हजार ४५० शेतकरी बांधवांना ५३९.५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. वाळलेल्या संत्रा झाडांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ८२ हजार प्रतिहेक्टर मदत दिली जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Damधरण