शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात अवकाळी पाऊस, गारपिटीचा ४३ गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

गहू हरभरा कांदा झोपला, संत्रा जमिनीवर, केळीचे नुकसान परतवाडा : अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने अचलपूर तालुक्यातील ...

गहू हरभरा कांदा झोपला, संत्रा जमिनीवर, केळीचे नुकसान

परतवाडा : अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने अचलपूर तालुक्यातील तब्बल ४३ गावांमधील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. गहू, संत्रा, कांदा, हरभरा, केळी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोमवारी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त काही भागांचा दौरा केला.

१९ आणि २० मार्च रोजी अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये शेतात उभ्या पिकांसह संत्र्याच्या आंबिया बहराला फटका बसला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, ५८८ हेक्टरमधील गहू, ९४.३० हेक्टर कांदा, तीन हेक्टर हरभरा, तर फळपिकांत २ हजार ९०० हेक्टरमधील संत्री, ५५ हेक्टरमधील केळी या पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार मदन जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी धामणगाव गढी, एकलासपूर आदी भागांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यानुसार तात्काळ सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी दिली.

बॉक्स

रबी पिकांचे सर्वाधिक नुकसान

अचलपूर व मेळघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत अचलपूर तालुक्यातील अनेक गावांचा नुकसानग्रस्तांच्या यादीत समावेश आहे. चमक खुर्द, चमक बुद्रुक, सुरवाडा, चाचोंडी, देवरी, खांबोरा, तुळजापूर जहागीर, नायगाव, कविठा खुर्द, धामणगाव गढी, देवगाव, पिंपळखुटा, बोपापूर, निमदरी, एकलासपूर, धोतरखेडा, सालेपूर, कोठारा, वडुरा, बेलखेडा, पांढरी, निमखेडा, मल्हारा, म्हसोना, गौरखेडा कुंभी, औरंगपूर, काळवीट, बुरुडघाट, चौसाळा खोजपुर, खानापूर, बिलखेडा आदी जवळपास ४७ गावांत पिकांचे नुकसान झाले आहे.

कोट

अचलपूर तालुक्यातील जवळपास ४७ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. गहू, संत्रा, हरभरा, केळी, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी, अचलपूर

पान ३ चे लिड