शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वाघांचे मृत्यू वाढले; व्याघ्र तस्करीच्या बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 11:29 IST

राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.

ठळक मुद्दे महामार्गावर स्पीड गन लावण्याच्या सूचना

अमरावती : विदर्भात आकस्मिक अथवा घातपाताने वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने दिले आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर स्पीड गन लावण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने दिल्या आहेत.

राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. विदर्भातील वन्यजीवांच्या मृत्युविषयी ना. ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली होती, हे विशेष. दरम्यान, व्याघ्र प्रकल्पांच्या टायगर क्राइम सेलनेही पडद्याआड असलेल्या मध्य प्रदेशातील बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर ठेवली आहे. या टोळीच्या सदस्यांचे स्थानिकांशी हितगुज, संबंधाविषयी चाचपणी केली जात आहे.

बहेलिया टोळीचे मध्य प्रदेशातील कटनी या प्रमुख केंद्रावर टायगर क्राइम सेल लक्ष रोखून आहे. गत काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, नागपूर पोलिसांनी रेल्वे स्थानक तर गोंदियातून व्याघ्र तस्करांना अटक केली होती. विदर्भात वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूविषयी या आराेपींचे सध्या लोकेशन तपासले जात आहे. त्याकरिता व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी पोलिसांची मदत घेत आहेत.

टायगर सेल समितीची बैठक

व्याघ्रांचे अनैसर्गिक मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टायगर सेल समितींना बैठकी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, अधिकारी बैठक घेणार असल्याची माहिती आहे.

आंतरजिल्हा सीमेवर वाहनांची होणार तपासणी

मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघांची शिकार, अवयवांची वाहतूक रोखण्यासाठी आंतरजिल्हा सीमेवर वाहनांची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संयुक्तपणे सीमेवर वाहनांची तपासणी करण्याची मोहीम राबवावी लागणार आहे.

वाघांचे मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. विजेच्या प्रवाहाने त्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राज्यात बहेलिया, बावरीया टोळी सक्रिय नाही. व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावात कोणी नवीन व्यक्ती दिसून आल्यास माहितीगाराकडून तशी माहिती प्राप्त होते.

- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर.

टॅग्स :Tigerवाघenvironmentपर्यावरणSmugglingतस्करी