शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

विद्यापीठ स्वीकारणार आता ऑनलाईन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST

अमरावती विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विस्तारलेले आहे. ३९५ महाविद्यालयांत पाच लाख विद्यार्थी एकूणच शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना जुजबी कामानिमित्त विद्यापीठात ये-जा करावी लागते. मात्र, प्रशासनाने विद्यापीठाशी संबंधित कामानिमित्त विद्यार्थ्यांना येण्याची गरज भासू नये, यासाठी ऑनलाईन तक्रारी हा नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे.

ठळक मुद्देऑफलाईनला ब्रेक : विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संबंधित समस्या, तक्रार असल्यास ती आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन सोडविता येणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने अर्जाचा नमुना तयार केला आहे. अर्जाचा नमुना व्हॉट्सअ‍ॅपवर टाकावा लागणार आहे. आठ दिवसांत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण होईल, अशी यंत्रणा प्रशासनाकडून उभारली जात आहे. ‘लॉकडाऊन’ नंतर याची अंमलबजावणी होणार आहे. ऑफलाईन तक्रारी स्वीकारल्या जाणार नाही, ही बाब विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केली आहे.अमरावती विद्यापीठाचे शैक्षणिक जाळे अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात विस्तारलेले आहे. ३९५ महाविद्यालयांत पाच लाख विद्यार्थी एकूणच शैक्षणिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना जुजबी कामानिमित्त विद्यापीठात ये-जा करावी लागते. मात्र, प्रशासनाने विद्यापीठाशी संबंधित कामानिमित्त विद्यार्थ्यांना येण्याची गरज भासू नये, यासाठी ऑनलाईन तक्रारी हा नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे. ऑनलाईन तक्रारीसाठी विद्यापीठ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देणार आहे. दरदिवशी या क्रमांकावर आलेल्या तक्रारींचे दुपारी १२.३० वाजता प्रिंटआऊड काढण्यात येणार आहे. प्राप्त तक्रारींची नोंद घेत विभागनिहाय ती सहायक कुलसचिवांकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर ज्या टेबलवर ही तक्रार आहे, त्या कर्मचाऱ्यांकडे ही कामे सुपूर्द केले जाईल. दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल. विद्यार्थ्यांनी पाठविलेली तक्रार, अडचण सोडविताना सदर कर्मचाऱ्यांना काही अडथळा आल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्याचे निरसन करण्यात येईल. या तक्रारीबाबतची अंतिम कार्यवाही सहायक कुलसचिव हे पुढे प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्याकडे पाठवतील. प्र-कुलगुरू यांनी क्रॉस चेकिंग केल्यानंतर तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन माहिती पाठविली जाईल, असे या नव्या प्रस्तावाचे स्वरूप असणार आहे.अशी करावी लागेल ऑनलाईन तक्रारविद्यार्थ्यांना ऑनलाईन तक्रार करताना कोऱ्या कागदावर स्वलिखित अर्ज करावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, महाविद्यालयाचे नाव, वर्गवारी (नियमित, माजी, बहि:शाल), परीक्षेचे नाव, परीक्षेचे वर्ष, संबंधित परीक्षेचा क्रमांक, परीक्षा केंद्राचे नाव, अडचणी तथा त्रुटीचे स्वरूप मोजक्याच शब्दांत आवश्यक, मोबाइल क्रमांक, व्हॉट्सअ‍ॅप असणे अनिवार्य करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तक्रारीबाबत प्रस्ताव आहे. कुलगुरूंची स्वाक्षरी व्हायची आहे. लॉकडाऊननंतर यावर अंमलबजावणी होईल. यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांना विद्यापीठ संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने येण्याची आवश्यकता नाही. आता ऑफलाईन तक्रार स्वीकारली जाणार नाही.- हेमंत देशमुख, संचालक,परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ