शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

अमरावती विद्यापीठाचा ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास नकार; प्राचार्यांना पाठविली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 15:37 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.

ठळक मुद्दे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.प्राचार्यांना नोटिसी बजावून या अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कामे सोपविण्यात आली आहेत. 

गणेश वासनिकअमरावती, दि.6 - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ३५ महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. प्राचार्यांना नोटिसी बजावून या अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कामे सोपविण्यात आली आहेत. 

अमरावती विद्यापीठांतर्गत यवतमाळ, वाशिम, बुलडाणा,अकोला व अमरावती या पाच जिल्ह्यांत एकूण ४१० महाविद्यालये आहेत. मात्र, पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असलेल्या ३५ महाविद्यालयांत ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेशित विद्यार्थी संख्या आहे. परंतु महाविद्यालय व्यवस्थापन विद्यार्थी संख्या कमी असतानासुद्धा हे अभ्यासक्रम सुरूच ठेवतात. ही बाब कुलगुरुंनी गठित केलेल्या त्रीसदस्यीय समितीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे तीन किंवा त्यापेक्षा कमी महाविद्यालयात शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेची जबाबदारी आता त्याच महाविद्यालयांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

विद्वत परिषदेच्या शिफारशीनुसार तीन किंवा त्यापेक्षा कमी महाविद्यालयांत शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाची परीक्षा संबंधित महविद्यालयांनी संचालित आणि कार्यान्वित करण्यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी त्रीसदस्यीय समिती गठित केली होती. सदर समितीच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने २० जून २०१७ रोजी ही बाब विषय क्रमांक १४० वरील चर्चेच्या अनुषंगाने मान्य केली. त्यामुळे आता ४० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्यास त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे संचलन त्या-त्या महाविद्यालयांना करावे लागेल. 

या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र आणि पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असलेल्या ३५ महाविद्यालयांवर गंडांतर आले आहे. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षेशी संबंधित कामे आता महाविद्यालयांनाच करावे लागतील. ही बाब प्राचार्यांना पाठविलेल्या नोटीशीद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच ज्या अभ्यासक्रमांना मागील तीन वर्षांपासून विद्यार्थी प्रवेशित नसतील किंवा जे अभ्यासक्रम बंद झालेत, याबाबतची माहिती विद्यापीठ प्रशासनाला तत्काळ सादर करण्याच्या सूचना प्राचार्यांना दिल्या आहेत.

‘दोन किंवा तीन महाविद्यालयात सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल जाहीर करताना तितकेच मनुष्यबळ लागते. त्यामुळे आता कमी विद्यार्थी संख्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेची जबाबदारी त्याच महाविद्यालयांवर सोपविली आहे. कुलगुरूंच्या आदेशानुसार प्राचार्यांना नोटिसी बजावल्या आहेत.- जयंत वडते, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

ही असेल महाविद्यालयांवर जबाबदारीविद्यार्थ्यांकडून परीक्षा आवेदनपत्रे भरून घेणे, प्रश्नपत्रिकांची छपाई करणे, परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रिका व प्रमाणपत्र वितरण यांसह परीक्षेशी निगडित कामे महाविद्यालयांनाच करावे लागतील.