शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पापळ विकास आराखड्यांतर्गत कामांचा दर्जा खालावला

By admin | Updated: May 23, 2015 00:41 IST

पापळ हे गाव डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जन्मभूमी असल्याने शासनाने या गावाचा कायापालट ....

कंत्राटदाराच्या मर्जीने कामे : बांधकाम विभागाचे कामाकडे दुर्लक्षपापळ : पापळ हे गाव डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जन्मभूमी असल्याने शासनाने या गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. या गावाकरिता १५ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामार्फत अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. काही कामे संथगतीने अद्यापही सुरू आहेत. विविध विकास कामांकरिता निधी मिळाला. पण सा. बां. विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामांना दर्जा मिळविण्यात कुचराई केली जात असल्याचे आरोप होत आहे. बरीच कामे दर्जाहीन झाल्याचे नमुने पहावयास मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या कामापैकी पापळ बसस्थानक परिसरातील चौपदरीकरणाचे काम, नाली काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होताना दिसत असून या कामावर सा. बां. विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर दिसत नाही. या कामामधील अडथळा असलेले विद्युत पोल (खांब) अद्यापही हटविण्यात आले नाही. मात्र हे पोल प्रथमत: हटवून हे काम सुरू करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता पोल मधात ठेवूनच रस्त्याचे काम सुरू केले आहे. याबाबत माजी सरपंच सुनील देशमुख यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून विचारले असता पोल काढले नसले तरी ते काम बरोबर होते, अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. तसेच प्रवेशद्वार, सादिलखाना, ग्रामपंचायतजवळील हॉलचे कामेसुद्धा निकृष्ट होताना दिसत आहे. कामावर पाणीसुद्धा टाकले जात नाही. साहित्य निकृष्ट दर्जाचा वापरत आहे. सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामावर हजर राहून सुरू असलेल्या कामाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पापळ येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांची बैठक बोलावून जनतेचे म्हणणे, समस्या जाणून घ्यावा अशी पापळ येथील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)