शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

समन्वयाने आदर्श गाव योजना राबवावी

By admin | Updated: November 16, 2014 22:43 IST

लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले.

आनंदराव अडसूळ यांचे प्रतिपादन : सांसद आदर्श गाव योजनेचा घेतला आढावाअमरावती : लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. आदर्श गाव योजनेअंतर्गत यावली (शहीद) हे गाव निवडण्यात आले असून त्यामध्ये कोणते विकास काम प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांसद आदर्श गाव योजनेचे महत्त्वाचे सात घटक असून त्यामध्ये वैयक्तिक विकास, मानव विकास, सामाजिक विकास, मूलभूत सूविधा स्वच्छ प्रशासन आदींचा समावेश आहे. यावेळी यावली (शहीद) ला असलेल्या ऐतिहासिक परंपरेमुळे आपण या गावाला प्राधान्य देत असल्याचे खासदार अडसूळ यांनी सांगितले. प्रामुख्याने गावातील पाणंद रस्ते, नाल्यांचे खोलीकरण, शुद्ध पाण्याचा पुरवठा, शहीद स्मारकाजवळील अपुरा रस्ता, खासदार निधीतून शाळांना संगणक, शौचालय, व्यायाम शाळेत सुसज्ज साधने याविषयी अडसूळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या योजनेअंतर्गत पाच वर्षांत पाचपेक्षा जास्त गावे आदर्श निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आदर्श गाव योजनेचा आढावा घेण्यात येईल व कालबद्ध पण गतीमान असा हा कार्यक्रम राबविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.