शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

उज्ज्वल निकम राजकारणात येणार; राजकारण हे उत्तम क्षेत्र असल्याचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:03 IST

ॲड. निकम यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या अमरावती कार्यालयास भेट दिली.

गणेश देशमुखअमरावती : राजकारण हे उत्तम क्षेत्र आहे. मोजक्या काही मंडळींमुळे अवघे राजकीय क्षेत्रच वाईट असल्याचा निष्कर्ष काढणे चूक आहे, असे सांगतानाच राजकारणात प्रवेश करणार काय, या प्रश्नावर बघू असे सूचक उत्तर प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी दिले. यापूर्वी शरद पवार यांनीही आपणांस खासदारकीबाबत विचारणा केली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

ॲड. निकम यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या अमरावती कार्यालयास भेट दिली. यावेळी ते म्हणाले, लोकप्रतिनिधी आभाळभर काम करतात. लोकांच्या प्रचंड उंचावलेल्या अपेक्षांमुळे ते कायम व्यस्त असतात. त्यांना सतत प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर पूर्वी चमचमणारा लाल दिवा असायचा. तो त्यांच्या वेगवान तरीही सुरक्षित प्रवासासाठीच; परंतु ‘व्हीआयपी’ संस्कृतीचे प्रतीक संबोधून तो काढून टाकला गेला. लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर लाल दिवा आवश्यक आहे.

न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले, साखळी न्यायव्यवस्थेत कुणावरही जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे सामान्यांच्या मनात न्यायाविषयी शंका असते ‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये,’ या तत्त्वावर जर न्यायव्यवस्था काम करीत असेल, तर न्यायव्यवस्थेतील चुकांची जबाबदारीही निश्चित व्हायला हवी. मी कायदे तयार करणाऱ्या सभागृहात गेलो, तर न्यायव्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी काम करेन, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम