शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाणीपुरवठ्याच्या १४२० गावांमध्ये दोन हजार कोटींचा घोटाळा, चौकशी समिती गठित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 18:16 IST

विभागातील बुलडाणा जिल्ह्यात १४२० गावांमध्ये झालेल्या पाणीपुरवठा योजनेत किमान दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे.

- गजानन मोहोड/अमरावतीविभागातील बुलडाणा जिल्ह्यात १४२० गावांमध्ये झालेल्या पाणीपुरवठा योजनेत किमान दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे. यावर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी वाशिम जिल्ह्यातील अभियंत्यांची पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली. समितीला गावे नेमून देऊन एक महिन्याच्या आत अहवाल मागितला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील किमान ७० टक्के पाणीपुरवठा योजना बंद आहेत. ज्या योजना सुरू आहेत, त्याद्वारे दोन-दोन आठवडे पाणी येत नाही. यामध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याने सीबीआय चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सोमवारी विभागीय आयुक्तांकडे केली. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी चौकशी समिती गठित केली. या योजनांसाठी संपादित विहिरींच्या जागेचे अधिकृत दानपत्रच नाही. या विहिरींना पाणी नसतानाही नळ योजनांची कामे करण्यात आली. पाच कोटींच्या आत योजनेची कामे होणार नाहीत, हे माहीत असतानाही अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने योजनेच्या निधीची उचल करून वाढीव निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला. तरीही कित्येक वर्षांपासूनची कामे अर्धवट आहेत. काही योजनांच्या कामांची चौकशीअंती जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात आली; मात्र एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोप समितीने केला आहे.जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात १४० गावांची योजना असताना पाणी ३० गावांहून पुढे सरकलेच नाही. सामुदायिक योजनांपैकी ९० टक्के योजना बंद स्वरूपातल्या असताना, त्यावर वाढीव निधी मागितला जात असल्याचा शासनअहवाल आहे. योजनांचे आॅडिट झालेले नाही. योजना अर्धवट असताना चुकीच्या पद्धतीने मोजमाप घेऊन संगनमताने निधी काढून घेतला. एकाच गावात तीन योजनांची कामे करण्यात आली; मात्र पाण्याचा थेंबही गावकºयांना मिळाला नसल्याचे समितीने नमूद केला आहे.वाशिम मधील अभियंता करणार बुलडाणा जिल्ह्याची चौकशीविभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांची तांत्रिक व लेखा तपासणी जिल्ह्याबाहेरील वाशिम जिल्ह्यातील अभियंते करणार आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता एस.व्ही. इथापे, कार्यकारी अभियंता ए.एम. खान, उपविभागीय अभियंता एन.एम. राठोड, कनिष्ठ भूवैज्ञनिक आर.जी. गवई व सहायक लेखाधिकारी एस.एस. देशमुख या पथकात आहेत. ते खामगाव तालुक्यातील सुटाळा, जळाका तेल्ही, शेगाव तालुक्यातील लासुरा, आळसाना, तरोडा, पारसूड, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे, बोराळा, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी व संग्रामपूर तालुक्यातील बावनविहीर व निपाणा येथील योजनांची चौकशी करणार आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी