शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दोन चिमुकले पुरात वाहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:01 IST

नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकाटआमला पुलावरील घटना : शाळा पाहून घरी येत होते परत

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. तब्बल दहा तासांनंतर मुलीचा मृतदेह हाती लागला, तर मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बहाद्दरपूर येथील जगदीश चौरे (३५) हे मुलगी धनश्री (११), मुलगा नैतिक (७) व वडील मारूती चौरे (६०) यांसह बुधवारी दुचाकीने बडनेऱ्याला आले होते. मुलांची शाळा पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी शालेय साहित्य घेतले आणि दुचाकीने गावाकडे निघाले. रात्री ८ वाजता ते काटआमलाच्या नाल्यावरील पुलानजीक पोहोचले. पाऊस सुरू असल्याने या पुलावरून पाणी वाहत होते. नेहमीचा रस्ता आहे; सहज निघून जाऊ, या बेतात जगदीशने दुचाकी नेली. मात्र, नाल्यावर नेमकी ती घसरली व हे चारही जण नाल्यात पडले आणि प्रवाहात सापडले. जगदीश चौरे व त्यांचे वडील कसेबसे काठावर आले; मात्र अंधारात दोन्ही मुले वाहत गेली. ही वार्ता जवळपासच्या गावात पोहोचताच रात्रीपासूनच गावकºयांनी शोधमोहीम राबविली. तब्बल दहा तासानंतर धनश्रीचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर पाण्यात आढळला. मात्र, नैतिकचा मृतदेह अद्याप सापडला नाही. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.परिसरातील काटआमला, बहाद्दरपूर, उत्तमसरा, परलाम, गणोरी येथील लोकांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. गुरूवारी सकाळी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी शोकमग्न कुटुंबाची भेट घेतली.शोध व बचाव पथक बेपत्ताजिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक या घटनेच्या ठिकाणी पोहोचले नव्हते. बडनेराचे ठाणेदार शरद कुळकर्णी, आसोरे व कर्मचारी, तलाठी एस.एस. गिल, महापालिका अग्निशमन दलाचे चार कर्मचारी व जवळपासच्या चार ते पाच गावांतील लोक रात्री ८ पासून दुसऱ्या दिवशी शोध घेत होते. या बाबीची दखल शोध व बचाव पथकाला घ्यावीशी वाटली नाही. याचा संताप गावकऱ्यांमध्ये होता.इसमाने चौघांना वाचविण्यासाठी घेतली उडीज्यावेळी हे चौघेही नाल्यात पडले, त्यावेळी काही लोक वाहत्या पाण्यामुळे थांबले होते. चौघे नाल्यात पडल्याचे पाहून बहाद्दरपूरचे पुरुषोत्तम सुभेदार यांनी नाल्यात उडी घेतली व चौघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात मुलगा वाहत जात असताना पुरुषोत्तमच्या हाती त्याचे शर्ट लागले. यादरम्यान पुरुषोत्तमला पाण्यात वाहून आलेल्या एका झुडुपाचा मार डोक्याला बसला. यामुळे नैतिक हातातून निसटला आणि पुढे वाहत गेला.

टॅग्स :floodपूरDeathमृत्यू