शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

दोन चिमुकले पुरात वाहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:01 IST

नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकाटआमला पुलावरील घटना : शाळा पाहून घरी येत होते परत

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. तब्बल दहा तासांनंतर मुलीचा मृतदेह हाती लागला, तर मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बहाद्दरपूर येथील जगदीश चौरे (३५) हे मुलगी धनश्री (११), मुलगा नैतिक (७) व वडील मारूती चौरे (६०) यांसह बुधवारी दुचाकीने बडनेऱ्याला आले होते. मुलांची शाळा पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी शालेय साहित्य घेतले आणि दुचाकीने गावाकडे निघाले. रात्री ८ वाजता ते काटआमलाच्या नाल्यावरील पुलानजीक पोहोचले. पाऊस सुरू असल्याने या पुलावरून पाणी वाहत होते. नेहमीचा रस्ता आहे; सहज निघून जाऊ, या बेतात जगदीशने दुचाकी नेली. मात्र, नाल्यावर नेमकी ती घसरली व हे चारही जण नाल्यात पडले आणि प्रवाहात सापडले. जगदीश चौरे व त्यांचे वडील कसेबसे काठावर आले; मात्र अंधारात दोन्ही मुले वाहत गेली. ही वार्ता जवळपासच्या गावात पोहोचताच रात्रीपासूनच गावकºयांनी शोधमोहीम राबविली. तब्बल दहा तासानंतर धनश्रीचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर पाण्यात आढळला. मात्र, नैतिकचा मृतदेह अद्याप सापडला नाही. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.परिसरातील काटआमला, बहाद्दरपूर, उत्तमसरा, परलाम, गणोरी येथील लोकांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. गुरूवारी सकाळी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी शोकमग्न कुटुंबाची भेट घेतली.शोध व बचाव पथक बेपत्ताजिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक या घटनेच्या ठिकाणी पोहोचले नव्हते. बडनेराचे ठाणेदार शरद कुळकर्णी, आसोरे व कर्मचारी, तलाठी एस.एस. गिल, महापालिका अग्निशमन दलाचे चार कर्मचारी व जवळपासच्या चार ते पाच गावांतील लोक रात्री ८ पासून दुसऱ्या दिवशी शोध घेत होते. या बाबीची दखल शोध व बचाव पथकाला घ्यावीशी वाटली नाही. याचा संताप गावकऱ्यांमध्ये होता.इसमाने चौघांना वाचविण्यासाठी घेतली उडीज्यावेळी हे चौघेही नाल्यात पडले, त्यावेळी काही लोक वाहत्या पाण्यामुळे थांबले होते. चौघे नाल्यात पडल्याचे पाहून बहाद्दरपूरचे पुरुषोत्तम सुभेदार यांनी नाल्यात उडी घेतली व चौघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात मुलगा वाहत जात असताना पुरुषोत्तमच्या हाती त्याचे शर्ट लागले. यादरम्यान पुरुषोत्तमला पाण्यात वाहून आलेल्या एका झुडुपाचा मार डोक्याला बसला. यामुळे नैतिक हातातून निसटला आणि पुढे वाहत गेला.

टॅग्स :floodपूरDeathमृत्यू