शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

दोन रूपयांची बैलजोडी, सहा रूपयांचा कर

By admin | Updated: November 3, 2016 00:20 IST

गावाचा सर्वांगीण विकास व्हावा व गावात स्वच्छता राहावी, यासाठी नगराध्यक्षपदी विराजमान होताच पहिले ...

आठवण निवडणुकीची : प्रथम नगराध्यक्ष सुगनचंद लुणावत मोहन राऊत धामणागाव रेल्वेगावाचा सर्वांगीण विकास व्हावा व गावात स्वच्छता राहावी, यासाठी नगराध्यक्षपदी विराजमान होताच पहिले नगराध्यक्ष झालेले सुगनचंद चुन्नीलाल लुणावत यांनी दोन रूपयांची बैलजोडी घेऊन गावाच्या विकासासाठी कोणताही शासनाकडून निधी मिळत नसल्याने इतर गावातून येणाऱ्या बैलगाड्यांवर महिन्याकाठी सहा रूपयांचा कर लावण्याचा निर्णय घेतला होता़धामणगाव पालिकेची पहिली निवडणूक ३० नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. यावेळी धामणगाव ही मध्यप्रदेशची राजधानी होती़ यावेळी झालेल्या निवडणुकीत सुगनचंदजी चुन्नीलाल लुणावत हे नगराध्यक्ष तर दोन उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मीनारायण दुलिचंद व देवराव नारायण इंगळे हे होते़ धामणगावातील मैला बाहेर नेण्यासाठी बैलजोडी नसल्याने नगराध्यक्षपदी विराजमान होताच सर्व सदस्यांच्या सहमतीने दोन रूपयांची बैलजोडी विकत घेतली व गावाच्या स्वच्छता मोहिमेकडे लक्ष वेधले होते़ धामणगाव ही पूर्वीच्या काळापासून व्यापारी पेठ असल्याने इतर गावातील बैलबंड्या कापूस व धान्य विक्रीकरिता धामणगाव शहरात येत असत. या काळात शासनाकडून कोणताच निधी मिळत नसल्याने महिन्याकाठी सहा रूपये करवसुली करण्यात येत होती. रीतसर पावती देऊन दरवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांना एकदा फाडलेली पावती महिन्याच्या शेवटपर्यंत शहरात येताना दाखवावी लागत असे़ करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी चौदा रूपये वेतन व अकरा रूपये महागाईभत्ता दिला जात होता़ महात्मा गांधींच्या हत्येची बातमी धामणगावात येताच संपूर्ण गावात स्मशानशांतता पसरली होती़ तर तिसऱ्या दिवशी पालिकेच्या परिसरात संपूर्ण गावाने एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली होती़ १ डिसेंबर १९४८ रोजी महाविदर्भ निर्मितीचा ठराव घेण्यात आला होता़ मध्यप्रदेश व वऱ्हाडचे कायदेमंत्री अण्णासाहेब देशमुख तसेच शिक्षणमंत्री गोखले यांना सन्मानपत्र देण्याकरिता ५० रूपयांचा खर्च सर्वानुमते ठरावात मंजूर करण्यात आला होता़ १९ एप्रिल १९४७ मध्ये मुन्सिपल कमिटीच्या ताब्यात असणाऱ्या शाळेतील शिक्षकांना महिन्याकाठी अकरा रूपये वेतन दिले जायचे़ सुगनचंद लुणावत यांनी ३० नोंव्हेबर १९४६ ते २५ मार्च १९५० पर्यंत यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता़ यावेळी सदस्य म्हणून मारोती किसनसा खंडेतोड, लक्ष्मण गोंविद झामरे, पदमसीभाई बेरसीभाई, शिवाजी मोतीराम, रणछोडदास खिमजी, सूरजमल मोतीलाल सोनी, जगदत्त महेश चौबे, रामहक्क जगदेव, रामणराव जानबाजी, नारायणराव किसनराव, लाभचंद गुलाबचंद राठी, तुळसीदास पंत जनार्धन देशपांडे, अबदुल शकरू उमर, कौशल्याबाई केणे हे प्रामुख्याने सदस्य म्हणून कार्यरत होते़