शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी आणखी दोघांना एनआयएकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 11:07 IST

चंदा गोळा करणाऱ्याचा समावेश, दुसऱ्याने केली पळण्यास मदत

अमरावती : नुपूर शर्मा यांच्या समर्थनातील पोस्ट फॉरवर्ड करणारे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने बुधवारी सकाळी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. यातील एकावर कोल्हे यांची हत्या घडवून आणण्यासाठी रक्कम वा वर्गणी गोळा करण्याचा, तर दुसऱ्यावर याआधी अटक सात आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. एनआयएच्या पथकाने बुधवारी सकाळी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करून शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आणले.

सूत्रानुसार, मुसीफ अहमद अ. रशीद (४१, रा. ट्रान्सपोर्टनगर, अमरावती) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (२३, रा. लालखडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एनआयएचे पथक दोन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहे. २१ जून रोजी रात्री १०.३०च्या सुमारास प्रभात चौकाकडून श्याम चौकाकडे जाणाऱ्या नूतन कन्याशाळेजवळ मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी आधी चाकूने हत्या करणाऱ्यांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर पशुचिकित्सक युसूफ खान व मास्टरमाईंड इरफान खान याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा करण्यात आला. २ जुलै रोजी पत्रपरिषद घेत पोलिसांनी उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे एनआयएकडे गेला. शहर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या सातही आरोपींचा ताबा एनआयएने घेतला. त्यांना एनआयएच्या मुंबईस्थित न्यायालयात हजर करून त्यांची एनआयए कोठडी मागण्यात आली होती.

...असा आहे आरोप

उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर व पूर्वीदेखील मुसीफने काही रक्कम गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, तर अ. अरबाज हा प्रकरणाचा मास्टरमाईंड शेख इरफान याचा निकटवर्तीय असून, त्याचा वाहनचालक आहे. तो अनेकदा इरफानसोबत राहत असल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पूर्वी अटक केलेल्या सात आरोपींच्या तपासातून या दोघांचा सहभाग समोर आला. त्याआधारे ‘एनआयए’च्या पथकाने त्या दोघांचा शोध घेऊन त्यांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले, तर त्यांची सखोल विचारपूस करून बुधवारी सकाळी अटक केली.

ट्रान्झिट रिमांड मिळाला

अटक आरोपींना अटकेनंतर २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘एनआयए’च्या पथकाने त्या दोघांनाही बुधवारी दुपारी स्थानिक प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळी स्थानिक न्यायालयाने ही विनंती मान्य करुन ७ ऑगस्टपूर्वी दोघांनाही मुंबईच्या ‘एनआयए’ न्यायालयात हजर करण्याबाबत परवानगी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा