शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

गोविंदांवर सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे

By admin | Updated: September 7, 2015 00:36 IST

शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात.

पाण्याचा अपव्यय : तीन दहिहंडी स्पर्धा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात. त्याकरिता सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. एकीकडे पाण्याच्या अभावी दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येते. दुसरीकडे धार्मिक भावनेतून पाण्याचा अपव्ययसुध्दा नागरिकांकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. थेंब थेंब तळे साचे ही म्हण प्रचलित आहे. काहीप्रसंगी जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते. अनेक वेळा उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याला इतके महत्त्व असतानाही धार्मिक भावनेतून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दरवर्षीच दिसून येतो. रविवारी शहरात गोविंदांच्या दहिहंडीची धूम सुरूझाल्यावर 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला'च्या गीतावर तरुण थिरकले. गोविंदाच्या अंगावर अग्निशमन विभागाकडून पाण्याचे फवारे उडविले जात होते. पाणी पुरवठ्याचे पैसे अग्निशमन विभागाकडून आकारण्यात आले आहे. मात्र, दरवर्षीच लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहत जाते. अग्निशमन विभागाकडून एका दहिहंडी स्पर्धेकरिता सुमारे २५ वाहनांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्या एका गाडीत तब्बल तीन हजार लिटर पाणी साठवले जाऊ शकते.अशातच शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी दहिहंडी स्पर्धा असल्यामुळे सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे गोविंदाच्या अंगावर उडविण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतानाही प्रशासनाकडून पाणी अपव्ययाबाबत काही मर्यादा का आखल्या जात नाहीत, असा प्रश्न उद्भवत आहे, याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आता काळाची गरज असल्याचे मत निसर्गपे्रमींनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)नगरसेवकांच्या निधीतून पाणी खर्चदहीहंडी स्पर्धांत पाणीपुरवठा व्हावा याकरिता नगरसेवकांकडून अग्निशमन दलाला पत्र पाठविण्यात येते. त्यामध्ये पाणी खर्च नगरसेवकांच्या निधीतून कपात करण्यात यावे, असे नमूद केले जाते. तेव्हा अग्निशमन विभाग पाण्याच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करते. सुरुवातीला एकाच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याकरिता प्रथम तीन तासांचे चार हजार रुपये आकारण्यात येते व त्यानंतरच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रतिटँकर एक हजार रुपये याप्रमाणे पैसे आकारले जाते. धार्मिक कार्यक्रमात जनभावनेचा विचार करून दरवर्षीच दहीहंडी कार्यक्रमात लाखो लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा तीन मोठ्या दहीहंडी स्पर्धांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पैसेसुध्दा आकारण्यात येते. आम्ही आमचे काम पूर्ण करीत आहेत. -भरतसिंह चव्हाण, अधिक्षक