शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

गोविंदांवर सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे

By admin | Updated: September 7, 2015 00:36 IST

शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात.

पाण्याचा अपव्यय : तीन दहिहंडी स्पर्धा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात. त्याकरिता सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. एकीकडे पाण्याच्या अभावी दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येते. दुसरीकडे धार्मिक भावनेतून पाण्याचा अपव्ययसुध्दा नागरिकांकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. थेंब थेंब तळे साचे ही म्हण प्रचलित आहे. काहीप्रसंगी जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते. अनेक वेळा उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याला इतके महत्त्व असतानाही धार्मिक भावनेतून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दरवर्षीच दिसून येतो. रविवारी शहरात गोविंदांच्या दहिहंडीची धूम सुरूझाल्यावर 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला'च्या गीतावर तरुण थिरकले. गोविंदाच्या अंगावर अग्निशमन विभागाकडून पाण्याचे फवारे उडविले जात होते. पाणी पुरवठ्याचे पैसे अग्निशमन विभागाकडून आकारण्यात आले आहे. मात्र, दरवर्षीच लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहत जाते. अग्निशमन विभागाकडून एका दहिहंडी स्पर्धेकरिता सुमारे २५ वाहनांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्या एका गाडीत तब्बल तीन हजार लिटर पाणी साठवले जाऊ शकते.अशातच शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी दहिहंडी स्पर्धा असल्यामुळे सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे गोविंदाच्या अंगावर उडविण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतानाही प्रशासनाकडून पाणी अपव्ययाबाबत काही मर्यादा का आखल्या जात नाहीत, असा प्रश्न उद्भवत आहे, याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आता काळाची गरज असल्याचे मत निसर्गपे्रमींनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)नगरसेवकांच्या निधीतून पाणी खर्चदहीहंडी स्पर्धांत पाणीपुरवठा व्हावा याकरिता नगरसेवकांकडून अग्निशमन दलाला पत्र पाठविण्यात येते. त्यामध्ये पाणी खर्च नगरसेवकांच्या निधीतून कपात करण्यात यावे, असे नमूद केले जाते. तेव्हा अग्निशमन विभाग पाण्याच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करते. सुरुवातीला एकाच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याकरिता प्रथम तीन तासांचे चार हजार रुपये आकारण्यात येते व त्यानंतरच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रतिटँकर एक हजार रुपये याप्रमाणे पैसे आकारले जाते. धार्मिक कार्यक्रमात जनभावनेचा विचार करून दरवर्षीच दहीहंडी कार्यक्रमात लाखो लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा तीन मोठ्या दहीहंडी स्पर्धांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पैसेसुध्दा आकारण्यात येते. आम्ही आमचे काम पूर्ण करीत आहेत. -भरतसिंह चव्हाण, अधिक्षक