शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदांवर सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे

By admin | Updated: September 7, 2015 00:36 IST

शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात.

पाण्याचा अपव्यय : तीन दहिहंडी स्पर्धा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात. त्याकरिता सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. एकीकडे पाण्याच्या अभावी दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येते. दुसरीकडे धार्मिक भावनेतून पाण्याचा अपव्ययसुध्दा नागरिकांकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. थेंब थेंब तळे साचे ही म्हण प्रचलित आहे. काहीप्रसंगी जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते. अनेक वेळा उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याला इतके महत्त्व असतानाही धार्मिक भावनेतून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दरवर्षीच दिसून येतो. रविवारी शहरात गोविंदांच्या दहिहंडीची धूम सुरूझाल्यावर 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला'च्या गीतावर तरुण थिरकले. गोविंदाच्या अंगावर अग्निशमन विभागाकडून पाण्याचे फवारे उडविले जात होते. पाणी पुरवठ्याचे पैसे अग्निशमन विभागाकडून आकारण्यात आले आहे. मात्र, दरवर्षीच लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहत जाते. अग्निशमन विभागाकडून एका दहिहंडी स्पर्धेकरिता सुमारे २५ वाहनांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्या एका गाडीत तब्बल तीन हजार लिटर पाणी साठवले जाऊ शकते.अशातच शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी दहिहंडी स्पर्धा असल्यामुळे सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे गोविंदाच्या अंगावर उडविण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतानाही प्रशासनाकडून पाणी अपव्ययाबाबत काही मर्यादा का आखल्या जात नाहीत, असा प्रश्न उद्भवत आहे, याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आता काळाची गरज असल्याचे मत निसर्गपे्रमींनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)नगरसेवकांच्या निधीतून पाणी खर्चदहीहंडी स्पर्धांत पाणीपुरवठा व्हावा याकरिता नगरसेवकांकडून अग्निशमन दलाला पत्र पाठविण्यात येते. त्यामध्ये पाणी खर्च नगरसेवकांच्या निधीतून कपात करण्यात यावे, असे नमूद केले जाते. तेव्हा अग्निशमन विभाग पाण्याच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करते. सुरुवातीला एकाच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याकरिता प्रथम तीन तासांचे चार हजार रुपये आकारण्यात येते व त्यानंतरच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रतिटँकर एक हजार रुपये याप्रमाणे पैसे आकारले जाते. धार्मिक कार्यक्रमात जनभावनेचा विचार करून दरवर्षीच दहीहंडी कार्यक्रमात लाखो लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा तीन मोठ्या दहीहंडी स्पर्धांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पैसेसुध्दा आकारण्यात येते. आम्ही आमचे काम पूर्ण करीत आहेत. -भरतसिंह चव्हाण, अधिक्षक