शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अडीच हजार झाडांची होणार कापणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण आणि गाव सोडून पुढील आणि मागील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देअमरावती-परतवाडा मार्ग : ५८ किमी अंतरात तोडलेल्याच्या तिप्पट वृक्ष लावली जाणार

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अमरावती-परतवाडा या ब्रिटिशकालीन मार्गाचे चौपदरीकरण करण्यास एशियन डेव्हलमेंट बँक (एडीबी) ने तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर या कामात रस्त्याच्या दुतर्फा असलेली अडीच हजारांहून अधिक मोठी झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गाची दाट सावली हिरावणार आहे.५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण आणि गाव सोडून पुढील आणि मागील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. सहाशे कोटींहून अधिक खर्च या रस्त्यावर केला जाणार आहे. यात भूसंपादनाची कुठलीही तरतूद नाही. उपलब्ध मार्गाचे उपलब्ध जागेवरच चौपदरीकरण होणार आहे. या ब्रिटिशकालीन मार्गाला १९६७ मध्ये सर्वप्रथम राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला. आता चौपरीकरणानंतर तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वेक्षण करुन विकास आराखडाही मंजूर केला तसेच हा रस्त्या एडीबीकडे वर्ग केला. भोपाळ येथील कंपनीकडून या रस्त्याचे सर्वेक्षण झाले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची, प्रस्तावाची पाहणी करून काही बदल सुचविले आहेत. महाराष्ट्र-मध्य प्रदेश असा हा आंतरराज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून नावरूपास येणार आहे.ब्रिटिशकालीन तीन पूलशंभर-सव्वासे वर्षांहून अधिक जुन्या या मार्गावर वलगावजवळ पेढी नदीवर, आसेगाव येथील पूर्णा नदीवर व भुगावजवळीत पिली नदीवर पूल आहे. त्यांचे अस्तित्व चौपदरीकरणात कायम राहणार आहे.कडुनिंबाची झाडे इतिहासजमाया मार्गावर स्त्याच्या दुतर्फा मोठी, जुनी शेकडो कडुनिंबाची झाडे आहेत. यातील काही झाडे शंभर वर्षाहून अधिक वयाची आहेत. अमरावतीहून निघाल्यानंतर परतवाड्यापर्यंत ही शेकडो कडुनिंबाची हिरवीगार झाडे प्रवाशांच्या आरोग्यासह पर्यावरणासही पोषक ठरली. पण आता या मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याने ती तोडली जाणार आहेत. यामुळे ही झाडे इतिहासजमा होणार आहेत.या रस्त्याच्या कामात अडीच हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. पण, त्याच्या मोबदल्यात तोडल्या जाणाºया झाडांच्या तिप्पट वृक्ष मार्गाच्या दुतर्फा लावले जाणार आहेत. या रोपांचे झाडांचे संरक्षण व संवर्धन पुढील तीन वर्षे संबंधित यंत्रणेलाच करावे लागणार आहे.-विजय वाट, उपविभगीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर

टॅग्स :forestजंगल