शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरात बहरली लिंब, सीताफळाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:37 IST

शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.

ठळक मुद्देपाण्याचे नियोजन : निवृत्त प्राचार्याने धरली शेतीची कास; युवा वर्गाने घ्यावी वेगळी पिके

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.अर्जुन गांजरे यांना शेतीची आवड आहे. तथापि, नोकरीमुळे त्यांना शेती करता आली नाही. पण, निवृत्तीनंतर त्यांनी शेतातील अभिनव प्रयोग इतरांसमोर ठेवले आहे. गांजरे यांनी वऱ्हा येथील पाच एकर शेतापैकी अडीच एकरात ५०० लिंबांची थायलंड सीडलेस जातीची आणि ५०० सीताफळाची झाडे लावली. अवघ्या दीड वर्षांतच लिंबांच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लागली. पुढल्या वर्षी सीताफळाला फळे येतील, असे गांजरे म्हणाले.झाडाला दीडशेवर लिंबझाडांचे कलम अर्जुन गांजरे यांनी नाशिकहून आणले होते. रासायनिक खतासोबतच त्यांनी सेंद्रिय खताचाही वापर केला. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला. योग्य काळजी घेतल्याने पीकांचा चांगली वाढ झाली. लिंबाच्या एका झाडाला दीडशेहून अधिक लिंबे पाहायला मिळतात. गांजरे यांना या शेतीतून वर्षाला दीड लाखांचा नफा होतो.पाण्याचे नियोजन महत्त्वाचेउन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक मागणी असते. तथापि, या हंगामात फळबाग टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कारण उन्हाळ्यात पाणी कुठून आणणार, हा प्रश्न असतो. मात्र, त्यांच्या शेतात पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा असून, नियोजनही योग्य आहे. त्यामुळे भर उन्हात त्यांची फळबाग बहरली दिसून येते.

टॅग्स :Farmerशेतकरी