शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अडीच एकरात बहरली लिंब, सीताफळाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:37 IST

शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.

ठळक मुद्देपाण्याचे नियोजन : निवृत्त प्राचार्याने धरली शेतीची कास; युवा वर्गाने घ्यावी वेगळी पिके

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेती करणे हा सद्यस्थितीत तोट्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, एका निवृत्त प्राचार्याने निवृत्तीपश्चात शेती यशस्वी केली आहे. वऱ्हा येथील अर्जुन गांजरे यांनी शेतात लिंब आणि सीताफळाची बाग फुलविली आहे.अर्जुन गांजरे यांना शेतीची आवड आहे. तथापि, नोकरीमुळे त्यांना शेती करता आली नाही. पण, निवृत्तीनंतर त्यांनी शेतातील अभिनव प्रयोग इतरांसमोर ठेवले आहे. गांजरे यांनी वऱ्हा येथील पाच एकर शेतापैकी अडीच एकरात ५०० लिंबांची थायलंड सीडलेस जातीची आणि ५०० सीताफळाची झाडे लावली. अवघ्या दीड वर्षांतच लिंबांच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लागली. पुढल्या वर्षी सीताफळाला फळे येतील, असे गांजरे म्हणाले.झाडाला दीडशेवर लिंबझाडांचे कलम अर्जुन गांजरे यांनी नाशिकहून आणले होते. रासायनिक खतासोबतच त्यांनी सेंद्रिय खताचाही वापर केला. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला. योग्य काळजी घेतल्याने पीकांचा चांगली वाढ झाली. लिंबाच्या एका झाडाला दीडशेहून अधिक लिंबे पाहायला मिळतात. गांजरे यांना या शेतीतून वर्षाला दीड लाखांचा नफा होतो.पाण्याचे नियोजन महत्त्वाचेउन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक मागणी असते. तथापि, या हंगामात फळबाग टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कारण उन्हाळ्यात पाणी कुठून आणणार, हा प्रश्न असतो. मात्र, त्यांच्या शेतात पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा असून, नियोजनही योग्य आहे. त्यामुळे भर उन्हात त्यांची फळबाग बहरली दिसून येते.

टॅग्स :Farmerशेतकरी