शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रेशन दुकानातून तूर डाळ झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

ग्राहकांना प्रतीक्षा : डाळ नियमित येत नसल्याने लाभार्थ्यांची अडचण अमरावती: गोरगरिबांना आधार असलेली स्वस्त धान्य दुकानावर सध्या ...

ग्राहकांना प्रतीक्षा : डाळ नियमित येत नसल्याने लाभार्थ्यांची अडचण

अमरावती: गोरगरिबांना आधार असलेली स्वस्त धान्य दुकानावर सध्या तूर डाळ उपलब्ध नसल्याने शिधापत्रिकाधारकांना डाळीपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. सावर्जनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना नियमित डाळीचा पुरवठा होत नसून ही डाळ कधी येते तर कधी येत नाही. सध्या स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना अत्यल्प दरात अन्यधान उपलब्ध करून दिले जात आहे. लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने केंद्र शासनाने एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्राधान्यक्रम अंत्योदय कार्डधारकांना मोफत तांदूळ व गहू वितरित केले. दरम्यान, नोव्हेबर महिन्यापाूसन रेशन दुकानांतून तूर डाळ मिळणे बंद झाले आहे. जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार २ एवढे रेशन कार्डधारक लाभार्थी आहेत. तर ८००२८ एपील (केसरी) आणि २३,८८८ एपील (पांढरे) रेशन कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना उत्पन्न जास्त असल्याने स्वस्त धान्याचा लाभ दिला जात नाही. मात्र गहू, तांदूळ व साखर शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानात पात्र असलेल्या रेशन कार्डधारकांना दिले जात आहे. परंतु दोन महिन्यापासून तूर डाळ देणे बंद झाल्यामुळे रेशन कार्डधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.

बॉक्स

डाळ नसल्याच्या तक्रार कुठे?

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एखाद्या शिधापत्रिकाधारकाला धान्य मिळत नसेल तर त्यांची तक्रार संबंधित तालुकास्तरावर अन्ननिरीक्षकांकडे केली जाऊ शकते. तेथे न्याय न मिळल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे तक्रार करून हक्काचे रेशन मिळत नसल्याचे सांगण्यात येऊ शकते. केलेल्या तक्रारीबाबत संबंधित विभागाकडून चौकशी केल्यावर आरोप सिध्द झाल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही वेळप्रसंगी रद्द केला जाऊ शकतो. मात्र बहुतांश वेळी तक्रारच होत नसल्याने कारवाईसुध्दा होत नाही.

बॉक्स

रेशनवर गहू तांदूळ मिळतो

स्वस्त धान्य दुकानावर दर महिन्याला देण्यात येणाऱ्या नियमित धान्यासह अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिकाधारकाला साखरेचे वाटप केले जाते. नियमित धान्यामध्ये गहू, तांदूळ वाटप केले जात आहे. कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति सदस्य तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले गेलेत.

कोट

स्वस्त धान्य दुकानामार्फत पीएमजीकेऐवाय योजनेंतर्गत गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत तूर डाळ वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून डाळीचे नियतन अप्राप्त आहे. याबाबत वरिष्ठाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनेप्रमाणे पुढे कारवाई केली जाईल.

अनिल टाकसाळे

जिल्हा पुरवठा अधिकारी

बॉक्स

एकूण शिधापत्रिकाधारक ५,४७,००२

अंत्योदय योजना १,२३,६२७

प्राधान्य कुटुंब गट ३,०१,७३३

एपील शेतकरी १,२१,६४२