शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातून तूर डाळ झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

ग्राहकांना प्रतीक्षा : डाळ नियमित येत नसल्याने लाभार्थ्यांची अडचण अमरावती: गोरगरिबांना आधार असलेली स्वस्त धान्य दुकानावर सध्या ...

ग्राहकांना प्रतीक्षा : डाळ नियमित येत नसल्याने लाभार्थ्यांची अडचण

अमरावती: गोरगरिबांना आधार असलेली स्वस्त धान्य दुकानावर सध्या तूर डाळ उपलब्ध नसल्याने शिधापत्रिकाधारकांना डाळीपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. सावर्जनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना नियमित डाळीचा पुरवठा होत नसून ही डाळ कधी येते तर कधी येत नाही. सध्या स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना अत्यल्प दरात अन्यधान उपलब्ध करून दिले जात आहे. लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने केंद्र शासनाने एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्राधान्यक्रम अंत्योदय कार्डधारकांना मोफत तांदूळ व गहू वितरित केले. दरम्यान, नोव्हेबर महिन्यापाूसन रेशन दुकानांतून तूर डाळ मिळणे बंद झाले आहे. जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार २ एवढे रेशन कार्डधारक लाभार्थी आहेत. तर ८००२८ एपील (केसरी) आणि २३,८८८ एपील (पांढरे) रेशन कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना उत्पन्न जास्त असल्याने स्वस्त धान्याचा लाभ दिला जात नाही. मात्र गहू, तांदूळ व साखर शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानात पात्र असलेल्या रेशन कार्डधारकांना दिले जात आहे. परंतु दोन महिन्यापासून तूर डाळ देणे बंद झाल्यामुळे रेशन कार्डधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.

बॉक्स

डाळ नसल्याच्या तक्रार कुठे?

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एखाद्या शिधापत्रिकाधारकाला धान्य मिळत नसेल तर त्यांची तक्रार संबंधित तालुकास्तरावर अन्ननिरीक्षकांकडे केली जाऊ शकते. तेथे न्याय न मिळल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे तक्रार करून हक्काचे रेशन मिळत नसल्याचे सांगण्यात येऊ शकते. केलेल्या तक्रारीबाबत संबंधित विभागाकडून चौकशी केल्यावर आरोप सिध्द झाल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही वेळप्रसंगी रद्द केला जाऊ शकतो. मात्र बहुतांश वेळी तक्रारच होत नसल्याने कारवाईसुध्दा होत नाही.

बॉक्स

रेशनवर गहू तांदूळ मिळतो

स्वस्त धान्य दुकानावर दर महिन्याला देण्यात येणाऱ्या नियमित धान्यासह अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिकाधारकाला साखरेचे वाटप केले जाते. नियमित धान्यामध्ये गहू, तांदूळ वाटप केले जात आहे. कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति सदस्य तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले गेलेत.

कोट

स्वस्त धान्य दुकानामार्फत पीएमजीकेऐवाय योजनेंतर्गत गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत तूर डाळ वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून डाळीचे नियतन अप्राप्त आहे. याबाबत वरिष्ठाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनेप्रमाणे पुढे कारवाई केली जाईल.

अनिल टाकसाळे

जिल्हा पुरवठा अधिकारी

बॉक्स

एकूण शिधापत्रिकाधारक ५,४७,००२

अंत्योदय योजना १,२३,६२७

प्राधान्य कुटुंब गट ३,०१,७३३

एपील शेतकरी १,२१,६४२