शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजारदरानेच रेशन दुकानातही तूरडाळ

By admin | Updated: July 8, 2016 00:03 IST

तुरडाळीच्या भडकलेल्या दरांमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या ताटातील डाळ गायब झाली आहे. महागाईच्या या कचाट्यात जगणे अवघड होऊन बसले आहे.

शासनाकडून थट्टा : शिधापत्रिकेवर मिळणार किलोभर डाळजितेंद्र दखने अमरावतीतुरडाळीच्या भडकलेल्या दरांमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या ताटातील डाळ गायब झाली आहे. महागाईच्या या कचाट्यात जगणे अवघड होऊन बसले आहे. यापासून काहीसा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ५ जुलै रोजी अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिका कार्डधारकांना प्रत्येक महिन्याला एक किलो तूरडाळ देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे. मात्र या निर्णयावर जनसामान्यातून टिकेचा सूर उमटला आहे. बाजारामध्ये १२० ते १३० प्रतिकिलो दराने तूरडाळ उपलब्ध असतांना ५ ते ६ सहाजणांच्या कुटुंबाला १ किलो डाळ आणि तीही बाजारभावाने, ही गोरगरिबांची सरकारने केलेली थट्टाच असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांना संताप व्यक्त करून १२० रूपयांनी नव्हे तर २० रूपयांनी डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ९३२ कुटुंबांना ही डाळ १२० रूपये प्रतिकिलो मिळणार आहे.डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा शासनाला अपयश आले. यामुळे लोकांमध्ये शासनाविरोधी नाराजी पसरली आहे. यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील ७० लाख कुटुंबांना रेशनिंगच्या माध्यमातून महिन्याला १ किलो तूरडाळ देण्यात येणार आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यामधील अंत्योदय १ लाख १७ हजार ९०४ आणि बिपीएलच्या १ लाख ६१ हजार २८ अशा दोन्ही मिळून २ लाख ७८ हजार ९३२ शिधापत्रिकाधारकांना ही डाळ स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे. मात्र तूरडाळीचे दर १२० रुपये किलो राहणार असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना या दराने डाळ खरेदी करणे शक्य आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.डाळीबाबत आदेश नाहीतराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशनिंगवर अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र याबाबत पुरवठा विभागाला अद्याप कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. याबाबत राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून जे आदेश मिळतील त्यानुसार स्वस्त धान्य दुकानामार्फत याबाबत अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे तूरडाळ देण्याच्या निर्णयामुळे काहीही फरक पडणार नाही. दुकानात १२० रुपये तर बीपीएलवर २० रुपये किलोप्रमाणे तूरडाळ दिली पाहिजे. तरच गोरगरिबांना तूरडाळ खरेदी करता येईल.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसखरीप हंगामात तूृर पिकाची पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांची तूर बाजारपेठेत येईल. मध्यंतरीच्या काळात सर्वसामान्यांना भाववाढीपासून वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुनील देशमुख,आमदार शासनाने रेशन दुकानातील इतर धान्या प्रमाणेच तूरडाळ सवलतीच्या दरात सर्व ग्राहकांना मिळायला पाहीजे. तूर डाळीबाबत पुरवठा विभागाच्या रेशन दुकानांना सुचना नाहीत.- सुरेश पाटील उल्हेअध्यक्ष, रेशन दुकानदार संघटनाबाजारपेठेत असलेल्या तूर डाळीच्या जुळत्या भावात स्वस्त धान्य दुकानात १२० रुपये प्रमाणे डाळ मिळत असली तरी त्यात गुणवत्ता राहणार नाही. - अजय गाडेसंघटन मंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत