शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाजारदरानेच रेशन दुकानातही तूरडाळ

By admin | Updated: July 8, 2016 00:03 IST

तुरडाळीच्या भडकलेल्या दरांमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या ताटातील डाळ गायब झाली आहे. महागाईच्या या कचाट्यात जगणे अवघड होऊन बसले आहे.

शासनाकडून थट्टा : शिधापत्रिकेवर मिळणार किलोभर डाळजितेंद्र दखने अमरावतीतुरडाळीच्या भडकलेल्या दरांमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या ताटातील डाळ गायब झाली आहे. महागाईच्या या कचाट्यात जगणे अवघड होऊन बसले आहे. यापासून काहीसा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ५ जुलै रोजी अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिका कार्डधारकांना प्रत्येक महिन्याला एक किलो तूरडाळ देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे. मात्र या निर्णयावर जनसामान्यातून टिकेचा सूर उमटला आहे. बाजारामध्ये १२० ते १३० प्रतिकिलो दराने तूरडाळ उपलब्ध असतांना ५ ते ६ सहाजणांच्या कुटुंबाला १ किलो डाळ आणि तीही बाजारभावाने, ही गोरगरिबांची सरकारने केलेली थट्टाच असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांना संताप व्यक्त करून १२० रूपयांनी नव्हे तर २० रूपयांनी डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ९३२ कुटुंबांना ही डाळ १२० रूपये प्रतिकिलो मिळणार आहे.डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा शासनाला अपयश आले. यामुळे लोकांमध्ये शासनाविरोधी नाराजी पसरली आहे. यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील ७० लाख कुटुंबांना रेशनिंगच्या माध्यमातून महिन्याला १ किलो तूरडाळ देण्यात येणार आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यामधील अंत्योदय १ लाख १७ हजार ९०४ आणि बिपीएलच्या १ लाख ६१ हजार २८ अशा दोन्ही मिळून २ लाख ७८ हजार ९३२ शिधापत्रिकाधारकांना ही डाळ स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे. मात्र तूरडाळीचे दर १२० रुपये किलो राहणार असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना या दराने डाळ खरेदी करणे शक्य आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.डाळीबाबत आदेश नाहीतराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशनिंगवर अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र याबाबत पुरवठा विभागाला अद्याप कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. याबाबत राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून जे आदेश मिळतील त्यानुसार स्वस्त धान्य दुकानामार्फत याबाबत अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे तूरडाळ देण्याच्या निर्णयामुळे काहीही फरक पडणार नाही. दुकानात १२० रुपये तर बीपीएलवर २० रुपये किलोप्रमाणे तूरडाळ दिली पाहिजे. तरच गोरगरिबांना तूरडाळ खरेदी करता येईल.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसखरीप हंगामात तूृर पिकाची पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांची तूर बाजारपेठेत येईल. मध्यंतरीच्या काळात सर्वसामान्यांना भाववाढीपासून वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुनील देशमुख,आमदार शासनाने रेशन दुकानातील इतर धान्या प्रमाणेच तूरडाळ सवलतीच्या दरात सर्व ग्राहकांना मिळायला पाहीजे. तूर डाळीबाबत पुरवठा विभागाच्या रेशन दुकानांना सुचना नाहीत.- सुरेश पाटील उल्हेअध्यक्ष, रेशन दुकानदार संघटनाबाजारपेठेत असलेल्या तूर डाळीच्या जुळत्या भावात स्वस्त धान्य दुकानात १२० रुपये प्रमाणे डाळ मिळत असली तरी त्यात गुणवत्ता राहणार नाही. - अजय गाडेसंघटन मंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत