शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आदिवासींची 'बेरोजगारी', 'वनहक्क', अन् 'पेसा' कायद्याची कायम जैसे थे

By गणेश वासनिक | Updated: April 11, 2024 19:10 IST

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेला ऐतिहासिक न्यायनिर्णयानुसार रेल्वे, बँका, पोस्ट ऑफिस, दूरसंचार व इतरही विभागात गैर आदिवासींनी आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा बळकावलेल्या आहेत.

अमरावती: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. प्रचाराचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवार प्रत्येक समाजाच्या समुहापर्यंत, घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. समुह, समाजाचे प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. मात्र आदिवासी समाजाचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडून आहे. कोणत्याही सरकारने आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाहीत. त्यामुळे आदिवासींचे अनेक दशकापासूनचे प्रश्न सुटलेले नाहीत. परिणामतः आदिवासी समाज हा घटनात्मक हक्कापासून दूरच आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेला ऐतिहासिक न्यायनिर्णयानुसार रेल्वे, बँका, पोस्ट ऑफिस, दूरसंचार व इतरही विभागात गैर आदिवासींनी आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा बळकावलेल्या आहेत. केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासकीय विभागाने दिलेल्या २७ हजार ६५३ पैकी २७३ प्रकरणांची सीबीआयने प्राथमिक चौकशी केली आहे. केंद्र सरकारच्या सेवेत ३० टक्के पेक्षा जास्त गैरआदिवासी असल्याचा सीबीआयचा निष्कर्ष आहे. अंदाजे हा आकडा ३ लाखाच्या घरात आहे. परंतु अद्यापही त्या जागा रिक्त करुन खऱ्या आदिवासी समाजातून भरलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी बेरोजगार आता नेमका कोणता पवित्रा घेतात, याकडे लक्ष लागले आहे.१) केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी २००६ मध्ये वनहक्क कायदा तयार केला. या कायद्यानुसार वनांचे व तेथील जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी स्थानिक लोकांवर टाकली आहे. मात्र देशभरात वनहक्कापासून १० लाख कुटुंब वंचित आहेत. वनहक्क कायदा तयार होऊन १८ वर्षे झाली. परंतु अद्यापही आदिवासी समाजबांधवांना वनहक्क मिळाले नाही. उलट त्यांना वनांमधून विकासाच्या नावांवर हुसकावून लावल्या जात आहे. विस्थापित केल्या जात आहे.२) 'पेसा कायदा' कायदा केंद्र सरकारने १९९६ मध्ये अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींसाठी तयार केला आहे. या कायद्यानुसार आदिवासी समाजाच्या परंपरा, स्थानिक नियोजनाबाबत ग्रामसभांना अधिकार दिले आहे. येथे 'ग्रामसभा सर्वोच्च' असून केंद्र अथवा राज्यसरकारचे कायदे लागू होत नाही. गेल्या २८ वर्षापासून आजपर्यंत केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करुन पेसा कायद्याशी सुसंगत असे कायदे तयार केले नाहीत. 'पेसा कायदा' इतर कायद्यापेक्षा वरचढ असूनही अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समाजाला त्याचा फारसा लाभ होत नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती