शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

राज्यात आदिवासी गोवारींचे सत्याग्रह आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 17:00 IST

२ ऑक्टोबर, गांधी जयंतीला राज्यात सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

मोहन राऊत 

अमरावती - गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंडगोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दीड महिने झाले. मात्र, राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने राज्यातील आदिवासी गोवारी जमातीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २ ऑक्टोबर, गांधी जयंतीला राज्यात सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

राज्यातील आदिवासी गोवारी समाज हक्काचा लढा अनेक वर्षांपासून लढत आहे. आपल्या  न्याय मागणीसाठी ११४ गोवारींचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नाही. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. अखेर १४ ऑगस्ट २०१८ रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळाला. मात्र न्यायालयीन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी राज्य शासनाने आजपर्यंत केली नाही व अध्यादेशसुद्धा काढलेला नाही.

शासनाला कधी जाग येणार 

सन १९५६ पासून गोवारी जमात अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट आहे. परंतु यादी तयार करताना चुकीने गोंडगोवारी अशी नोंद झाली होती. शासनाने केलेल्या या चुकीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी असलेल्या गोवारीच्या अनेक पिढ्या गारद झाल्या. अखेर उच्च न्यायालयाने न्याय दिला. आता राज्य शासनाला कधी जाग येणार, असा सवाल गोवारी समाजबांधवांनी केला आहे.

राज्यात सत्याग्रह आंदोलन 

दीड महिन्याचा काळ संपून राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेश मानले नाही. त्यामुळे राज्यातील गोवारी जमातीने महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनाला सुरुवात करणार आहे. या दिवशी सेवाग्राम येथे मशाल हाती घेऊन आंदोलनाला सुरुवात होईल. याच दिवशी प्रत्येक तालुक्यात प्रशासनासमोर निवेदनाच्या माध्यमातून कैफियत मांडणार आहे. जिल्हा प्रशासनाला निवेदन व थेट राज्यांतील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याची दिशा ठरविली आहे.

आम्ही हक्काच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने लढत आहे. २ ऑक्टोबरपासून राज्यात सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात येत आहे. गोवारी स्मारकासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. 

- शालिक नेवारे, समन्वयक, आदिवासी गोवारी समन्वय समिती नागपूर

टॅग्स :Amravatiअमरावतीagitationआंदोलन