शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

मेळघाटातील आदिवासी शेतकरी छतावर घेतात पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:42 IST

मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता घराच्या छतावरच गावात पाऊस किती झाला, याची नोंद घेऊ लागले आहेत.

ठळक मुद्देमेळघाटातील ११ गावांत प्रयोग घरी बनविले पर्जन्यमापक यंत्र

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता घराच्या छतावरच गावात पाऊस किती झाला, याची नोंद घेऊ लागले आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यातील ११ गावांमध्ये हा प्रयोग सुरू झाला असून, यातून पिण्याच्या पाण्यासह पिके कोणती घ्यावी, या महत्त्वपूर्ण बाबीवर चर्चा करीत भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना उन्हाळ्यात आदिवासींना करावा लागला. त्या उन्हाच्या गुन्ह्याच्या चटक्यात पाण्याचे महत्त्व चांगल्या प्रकारे शंभरपेक्षा अधिक गावांना कळले आहे. त्यामुळे कालपर्यंत श्रमदानासाठी नकार देणाऱ्या आदिवासी आता स्वत:हूनच पाण्यासाठी पुढाकार घेतला. वॉटर कप स्पर्धा अंतर्गत अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता थेट आपल्या गावात पाऊस किती झाला, त्याचे नियोजन कसे करायचे, या सर्व गोष्टी त्यांना वॉटर कप स्पर्धेच्या चमूने समजावून सांगताच त्यावर अंमलबजावणीही झाली.कमी खर्चात पर्जन्यमापक यंत्रटाकाऊ वस्तूंपासून अगदी कमी खर्चात पर्जन्यमापक यंत्र तयार करण्यात आले आहे. उंच भागासह घरावरील छतावर ते ठेवण्यात आले असून, त्यात पावसाची नोंद घेतली जात आहे. पर्जन्यमापक यंत्रासाठी समान व्यास असलेली काचेची किंवा प्लास्टिकची बरणी आणि एक स्केलपट्टी घेतल्यानंतर उंच भागावर ती पडू किंवा हलू नये, यासाठी चार विटांच्या मधात वाळू व त्यात वाईट सिमेंट टाकून घट्ट करण्यात येते. उन्हाळ्यात असे यंत्र लावण्यात आले असून, त्यात एका वही व दररोज पर्जन्यमानाचे नोंद घेतली जात आहे.पिण्याचे पाणी ते पेरणीपर्यंत फायदाआपल्या गावात पाऊस किती झाला, याची नोंद मेळघाटात कुठल्या गावात आजपर्यंत नव्हती. तालुकास्तरावर होणारी पावसाची नोंद ही त्या गावातली असल्याने उन्हाळ्याच्या नियोजनासह कुठले पीक घ्यावे, हे परंपरागत अनुभवावरून ठरत होते. आता गावात पावसाची नोंद होऊ लागल्याने पिण्यासाठी किती आवश्यक, गहू घ्यायचा की हरभरा, खरीप-रबीत कुठले पीक घ्यायचे आदी नियोजन करता येणार असल्याचे वाटर कप स्पर्धेचे स्वयंसेवक मनोज कुयटे यांनी ‘लोकमत’ला सांगितलेगावात वॉटर बजेटगावात पडणाऱ्या पावसाचा ताळेबंद मेळघाटात आता होणार आहे. पर्जन्यमापक यंत्रातून गावात एकूण पाऊस किती झाला, याची नोंद चिखलदरा तालुक्यात शेतकरी चार ठिकाणी होते. कुलंगणा येथे साधुराम खडके, मोथा येथे तेजु शेळके, बामादेही येथे राणू बेठेकर, आवागड येथे भानू चिमोटे ही नोंद घेतात. धारणी तालुक्यात बेरदाबल्डा, दहेंडा, बोथरा, चुटिया, घुटी, मान्सुवडी, बोबदो या गावांमध्ये नोंदी घेतल्या जात आहेत. 

टॅग्स :Melghatमेळघाट