शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास निधीचे होणार आॅडिट, अ‍ॅनालिसीस; विधिमंडळ आमदार समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:38 IST

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, हा निधी कोठे, कसा खर्च होतो याचे नियोजन नसल्याने योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहतात.

अमरावती : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, हा निधी कोठे, कसा खर्च होतो याचे नियोजन नसल्याने योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे आता आदिवासी विभागाचा निधी कोठे खर्च करण्यात आला, याचे आॅडिट, अ‍ॅनालिसीस केले जाईल, अशी माहिती अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ.अशोक उईके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आदिवासी विकास विभागाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे अथवा नाही? याच्या चाचपणीसाठी विधिमंडळ आदिवासी आमदार समिती राज्यभर दौरे करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. उईके यांनी बोलत होते. नाशिकनंतर नागपुरात ४ आॅक्टोबर रोजी विदर्भस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदिवासी विकास विभागातील नोकर भरती, पदोन्नतीे, रिक्त पदांची संख्या, बिंदूनामावली विलंबनाची कारणे तसेच वसतिगृह, आश्रमशाळांमध्ये दुरवस्था आदींबाबत माहिती समितीने जाणून घेतली. विशेषत: आदिवासी विकास विभागात येणारा निधी अन्य १३ यंत्रणांकडे विकासकामे, योजना, उपक्रम राबविण्यासाठी वळती केला जातो. परंतु एकदा वळता झालेला निधी व्यवस्थितरीत्या खर्च झाला अथवा नाही? याचे आॅडिट केले जात नाही. त्यामुळे आदिवासींच्या नावे येणा-या निधीवर दुसरेच लाभार्थी निधी पळवितात, ही बाब समितीने अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समिती अध्यक्ष उईके यांनी सांगितले. कृषी, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग व आरोग्य विभागाकडे दरवर्षी मोठ्या रक्कमेचा निधी विकासकामांच्या खर्चासाठी पाठविला जातो. मात्र या निधीचे विनियोग नीट झाले किंवा नाही? याबाबत अहवाल प्राप्त होत नाही. त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाने अन्य यंत्रणांना दिलेल्या निधीचे आॅडिट, अ‍ॅनालिसीस आमदार समिती करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आदिवासी लाभार्थ्यांची यादी मंजूर करताना ते बोगस असू नये, ही बाबसुद्धा ट्रायबल आमदार समितीने नागपूरच्या अपर आयुक्त माधवी खोडे, अमरावतीचे गिरीश सरोदे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आ.उईके म्हणाले. तसेच आमदार समितीने सूचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अधिकाºयांनी केले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे समितीने आढावा बैठकीत स्पष्ट केले आहे. यावेळी आ.देवराव होळी, आ.वैभव पिचड, आ.बरोरा, आ. श्रीकांत देशपांडे, आ.आनंद ठाकूर, आ.पास्कर धनारे आदी अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते.

‘शासनाकडून आदिवासींच्या विकासासाठी प्रचंड निधी येतो. परंतु हा निधी कोठे खर्च केला जातो, याबाबत विश्र्लेषण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे समितीने निधीबाबतचे आॅडिट, अ‍ॅनालिसीस करण्याचे ठरविले आहे.- अशोक उईक,अध्यक्ष, अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावती