शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

हक्काच्या घरकुलापासून आदिवासी वंचित

By admin | Updated: November 2, 2014 22:27 IST

कष्टाळू आणि काटक म्हणून ओळखला जाणारा आदिवासी समाज सहसा जंगलात वास्तव्य करणारा असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने शहराकडे धाव घेतली आहे.

सुनील देशपांडे- अचलपूरकष्टाळू आणि काटक म्हणून ओळखला जाणारा आदिवासी समाज सहसा जंगलात वास्तव्य करणारा असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने शहराकडे धाव घेतली आहे. या आदिवासी समाजाला हक्काचे निवासस्थान मिळावे यासाठी काँग्रेस शासनाच्या कारकिर्दीत शबरी आदिवासी घरकूल योजना लागू करण्यात आली होती. अचलपूर नगर पालिकेच्या व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जुळ्या शहरातील स्थानिक आदिवासींना शबरी घरकूल योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळू शकला नाही. 'लोकमत'ने याबाबत केलेल्या सर्व्हेमध्ये अनेक बाबी समोर आल्या. त्यात प्राप्त झालेल्या माहितीनुसार सासनाकडून जंगालाचे संरक्षणाचे कायदे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने जंगलात मुक्तसंचार करणारा आदिवासी समाज कुटुंबासह शहरी भागाकडे धाव घेऊ लागला आहे. रोजगार मिळण्यासाठी मेळघाटसह आदी भागातून आलेल्या आदिवासी कुटुंबांपैकी अचलपूर परतवाड्यात अंदाजे २०० पेक्षा जास्त कुटुंबं स्थायिक कसे तरी जीवन जगत असताना त्यांना अचलपूर-परतवाड्यातील मुगलाईपूरा कालीमातानगर, आझादनगर, पेन्शनपुरा, अब्बासपुरा, विलायतपुरा, सुलतानपुरा आदी ठिकाणी यांची कुटुंबे स्थायिक झालेली आहेत. ही आदिवासी कुटुंबे अनेक संकटांचा सामना करीत जीवन जगण्यासाठी धडपडत आहेत. त्यातील कित्येकांच्या घरात विद्युत पुरवठा नाही. पाणी पुरवठ्याचा नळ नाही. काही ठिकाणी तर नगरपरिषद साधी टॅक्स पावतीही फाडत नसल्याने या आदिवासी कुटुंबांना या प्राथमिक सुविधांपासून वंचित रहावे लागते. प्रत्येक आदिवासी कुटुंबाला हक्काचे घरकूल मिळावे यासाठी काँग्रेस शासनाने आदिवासी योजना सुरु केली होती. या योजनेचे २०१३ साली नाव बदलवून शबरी आदिवासी घरकूल योजना असे ठेवण्यात येऊन एका घरकुलासाठी १ लाख ५० हजार तर महानगरपालिका क्षेत्रात १ लाख ८० हजार रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेविषयी नगर पालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील ग्रामीण भागातही ही योजना राबविली गेली नाही. नगरपालिकेत दोन नगरसेवक अनुसूचित जाती प्रवर्गातील असून त्यांनीही ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.