शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी उमेदवार भरती प्रक्रिया अन् नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत

By गणेश वासनिक | Updated: September 2, 2024 17:01 IST

पेसा भरती : राज्य शासन ‘पॉझिटिव्ह’; बुधवारी ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

अमरावती : राज्यातील सर्वच विभागातील सर्व संवर्गांची भरती प्रक्रिया जवळपास आटोपली असून, केवळ अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्य शासन बुधवार, ४ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाला विनंती करून ‘सर्वोच्च’ निर्णयाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती आदेश, थेट नेमणुका देण्याबाबत विनंती करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यासंदर्भात राज्य शासनाने २७ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले, हे विशेष.

तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी ५वी अनुसूचीच्या पॅरा ५ (१) नुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरतीसंबंधात जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार २९ ऑगस्ट २०१९ रोजी अध्यादेश काढून लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के (कोतवाल आणि पोलिसपाटीलवगळता) आरक्षण दिले आहे. या अधीसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने १ फेब्रुवारी आणि २८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मात्र, सदर अधिसूचना आणि शासन निर्णयाला सामाजिक विकास प्रबोधिनी आणि बिगर आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी या सर्व याचिका अंतरिम याचिकांसह फेटाळल्या. या निर्णयाविरूद्ध पुन्हा सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २२१०९ /२०२३ ही ३० सप्टेंबर २०२३ रोजी दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सुनावणी झाली. या आदेशात न्यायालयाने पेसा भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया थांबवा, असेही म्हटले नाही. परंतु, सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑक्टोबर २०२३ आणि महसूल व वन विभागाने १७ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवली. पुढे मात्र आदिवासी उमेदवारांना वगळून ‘सर्वोच्च’ निर्णयाच्या अधीनस्त राहून बिगर आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. यावेळी मात्र न्यायालयाची कोणतीही परवानगी घेतली नाही. दरम्यान, राज्यात बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या विविध आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ २९ ऑगस्ट २०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर आदिवासी बांधवांची बैठक घेऊन नियुक्ती आदेश देण्याची ग्वाही दिली आहे.

हे आहेत पेसा क्षेत्रातील १३ जिल्हेराज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत. यापैकी १३ जिल्हे हे आदिवासी बहुल आहे. यात ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे .या १३ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रामधील १७ संवर्गातील केवळ आदिवासी उमेदवारांची भरती प्रकिया रखडली आहे. 

या अधिसूचनांचा फायदाच नाही◆ ९ जून २०१४◆ १४ ऑगस्ट २०१४◆ ३१ ऑक्टोबर २०१४◆ ३ जून २०१५◆ ९ ऑगस्ट २०१६◆ २३ नोव्हेंबर २०१६

"सर्वोच्च न्यायालयाने १९७३च्या केशवानंद भारती निकालामध्ये पाचव्या अनुसूचीला संविधानाच्या आत संविधान म्हटले आहे. परंतु, पाचव्या अनुसूचीची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तयार झालेल्या पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दशकापासून पेसा भरतीला ब्रेक लागला आहे. यासंदर्भात शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

टॅग्स :Amravatiअमरावती