शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

‘आधार’द्वारा मेळघाटातील आदिवासी बांधवांना मायेची पाखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:44 IST

आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली.

ठळक मुद्देसमाजॠणाची ऊतराई : नागरिकांच्या दातृत्वातून एक लाख २० लाखांवर वस्त्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली. तीन वर्षांत तब्बल २६ वेळा मेळघाटातील अतीदुर्गम गावांमध्ये स्वखर्चाने जाऊन एक लाख २० हजारांवर वस्त्रांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. समाजॠणाची ऊतराई करण्याचा आगळावेगळा संकल्प ‘आधार फाऊंडेशन’द्वारा करण्यात आला आहे.मेळघाटात पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना तेथील वस्तुस्थिती अनुभवास आली अन् त्याचक्षणी आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी संकल्प केल्याचे प्रदीप बाजड यांनी सांगितले. याला दिलीप हटवार, अनिल ढवळे, महेंद्र शेंडे, रामेश्वर वसू, अनंत बाजड, राजेश डिगवार, संजय राऊत, दीपक भेलकर, अरविंद विंचुरकर, चित्रा ढवळे, सविता बाजड आदींची साथ मिळाल्यानेच पाहता पाहताकपडे हा उपक्रम एक सामाजिक चळवळ बनल्याचे बाजड म्हणाले.यासाठी शहरात कलेक्शन सेंटर आहेत. ७० ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना वस्त्रदानाचे आवाहन केले असता, दर महिन्यांत पाच ते सात हजार कपडे या सेंटरवर जमा होतात. या कपड्यांचे ग्रेडींग करून व त्याचे गठ्ठे बांधून दर महिन्याला स्वखर्चाने मित्रांसोबत तर कधी परिवारासोबत जावून तेथे कपडे वाटण्यात येत आहे. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहरावरचा आनंद पाहून आपण जे काही करत आहे. त्या सामाजिक कार्याची पोचपावती त्याचक्षणाला मिळते. २ आॅक्टोबर २०१५ सुरूवात केलेल्या उपक्रम नागरिकांच्या दातृत्वामुळेच फलद्रुप होत असल्याचे बाजड यांनी आवर्जून सांगितले. समाजात वावरत असताना कळत नकळत समाजघटकांचे ॠ ण आपल्यावर होते, त्या समाजॠणाची ऊतराई करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.आपादग्रस्थांनाही मदतीचा हातकेवळ मेळघाटातच नव्हे, तर अमरावती शहरात उत्तमनगरातील घराला लागलेल्या आगीत खोब्रागडे कुटुंब निराधार झाले. त्या परिवाराला हातगाडी, शिलाई मशीन, धान्य, तेलाचा डबा, व तीन हजारांची मदत याशिवाय मेळघाटात सेमनाडोह परिसरात लागलेल्या आगीत बाधित झालेल्या ढाना, भवाई येथील परिवारांना वस्त्रांसोबत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. आपल्याला ज्या वस्तूंचे काम नाही, त्या जर या केंद्रावर जमा केल्या तर यामधून अनेकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, हे आधार फाऊंडेशनने दाखवून दिले आहे.२६ वेळा ११० गावांमध्ये वस्त्रांचे वाटपसहकाऱ्यांच्या मदतीने तीन वर्षांत मेळघाटातील तब्बल ११० गावांमध्ये लहानथोरांना वस्त्रांचे वाटप केलेले आहे. पहिल्यांदा २५ आक्टोबर २०१५ला ढाकना, डोिलार, सावऱ्या, मालूर. भांडुप येथे वस्त्रांचे वाटप केल्यानंतर माखला, बिच्छुखेडा, चुनखडी, आवागड, बोराटाखेडा, रेटाखेडा, भूत्रूम, रूईपठार, चिलाटी, हतरू, चेथर, केळदाबोद, चकवाभोळ, भोंडीलावा, रंगुबेली, काटकोह, काटा, कोठा, जांबू, नांदोरी, सोसाखेडा, चौराकुंड, चोपन, भुलोरी, लवादा, मांजरी, बानूर, धोतराढोणा, बिबा, हारू, खारी, हिडला, भवाई, बेला, जांबळी, लोणझरी, मांजरा, बिहाली, निमकुंड, कोहाना, धोतारखेडा, भांदरी, जामूननाला, बोरी, कागपूर, टेटू, अमझरीम खडकाली, आडनदी, पिली, रोरा, भवई, भूलोरी, कोकरू, देढपानी, अंबापाटी, माखला, चुनखडी आदी गावांना वस्त्रांचे वाटप करण्यात आले.