शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

‘आधार’द्वारा मेळघाटातील आदिवासी बांधवांना मायेची पाखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:44 IST

आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली.

ठळक मुद्देसमाजॠणाची ऊतराई : नागरिकांच्या दातृत्वातून एक लाख २० लाखांवर वस्त्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली. तीन वर्षांत तब्बल २६ वेळा मेळघाटातील अतीदुर्गम गावांमध्ये स्वखर्चाने जाऊन एक लाख २० हजारांवर वस्त्रांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. समाजॠणाची ऊतराई करण्याचा आगळावेगळा संकल्प ‘आधार फाऊंडेशन’द्वारा करण्यात आला आहे.मेळघाटात पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना तेथील वस्तुस्थिती अनुभवास आली अन् त्याचक्षणी आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी संकल्प केल्याचे प्रदीप बाजड यांनी सांगितले. याला दिलीप हटवार, अनिल ढवळे, महेंद्र शेंडे, रामेश्वर वसू, अनंत बाजड, राजेश डिगवार, संजय राऊत, दीपक भेलकर, अरविंद विंचुरकर, चित्रा ढवळे, सविता बाजड आदींची साथ मिळाल्यानेच पाहता पाहताकपडे हा उपक्रम एक सामाजिक चळवळ बनल्याचे बाजड म्हणाले.यासाठी शहरात कलेक्शन सेंटर आहेत. ७० ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना वस्त्रदानाचे आवाहन केले असता, दर महिन्यांत पाच ते सात हजार कपडे या सेंटरवर जमा होतात. या कपड्यांचे ग्रेडींग करून व त्याचे गठ्ठे बांधून दर महिन्याला स्वखर्चाने मित्रांसोबत तर कधी परिवारासोबत जावून तेथे कपडे वाटण्यात येत आहे. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहरावरचा आनंद पाहून आपण जे काही करत आहे. त्या सामाजिक कार्याची पोचपावती त्याचक्षणाला मिळते. २ आॅक्टोबर २०१५ सुरूवात केलेल्या उपक्रम नागरिकांच्या दातृत्वामुळेच फलद्रुप होत असल्याचे बाजड यांनी आवर्जून सांगितले. समाजात वावरत असताना कळत नकळत समाजघटकांचे ॠ ण आपल्यावर होते, त्या समाजॠणाची ऊतराई करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.आपादग्रस्थांनाही मदतीचा हातकेवळ मेळघाटातच नव्हे, तर अमरावती शहरात उत्तमनगरातील घराला लागलेल्या आगीत खोब्रागडे कुटुंब निराधार झाले. त्या परिवाराला हातगाडी, शिलाई मशीन, धान्य, तेलाचा डबा, व तीन हजारांची मदत याशिवाय मेळघाटात सेमनाडोह परिसरात लागलेल्या आगीत बाधित झालेल्या ढाना, भवाई येथील परिवारांना वस्त्रांसोबत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. आपल्याला ज्या वस्तूंचे काम नाही, त्या जर या केंद्रावर जमा केल्या तर यामधून अनेकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, हे आधार फाऊंडेशनने दाखवून दिले आहे.२६ वेळा ११० गावांमध्ये वस्त्रांचे वाटपसहकाऱ्यांच्या मदतीने तीन वर्षांत मेळघाटातील तब्बल ११० गावांमध्ये लहानथोरांना वस्त्रांचे वाटप केलेले आहे. पहिल्यांदा २५ आक्टोबर २०१५ला ढाकना, डोिलार, सावऱ्या, मालूर. भांडुप येथे वस्त्रांचे वाटप केल्यानंतर माखला, बिच्छुखेडा, चुनखडी, आवागड, बोराटाखेडा, रेटाखेडा, भूत्रूम, रूईपठार, चिलाटी, हतरू, चेथर, केळदाबोद, चकवाभोळ, भोंडीलावा, रंगुबेली, काटकोह, काटा, कोठा, जांबू, नांदोरी, सोसाखेडा, चौराकुंड, चोपन, भुलोरी, लवादा, मांजरी, बानूर, धोतराढोणा, बिबा, हारू, खारी, हिडला, भवाई, बेला, जांबळी, लोणझरी, मांजरा, बिहाली, निमकुंड, कोहाना, धोतारखेडा, भांदरी, जामूननाला, बोरी, कागपूर, टेटू, अमझरीम खडकाली, आडनदी, पिली, रोरा, भवई, भूलोरी, कोकरू, देढपानी, अंबापाटी, माखला, चुनखडी आदी गावांना वस्त्रांचे वाटप करण्यात आले.