शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

वृक्षलागवड खड्ड्यांविना अडली

By admin | Updated: July 21, 2015 00:19 IST

पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे.

योजनेचा फज्जा : पावसाळा संपतोय, खड्डे खोदणार तरी कधी ? चांदूरबाजार : पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे. पण तसे झाले नाही. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी पुन्हा वृक्षारोपणाचा बिगूल वाजला आहे. या योजनेसाठी योग्य आकारमानात एप्रिल महिन्यात खड्डे खोदणे अपेक्षित होते. पण, काही गावांमध्ये अद्यापही याप्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. शासनातर्फे पर्यावरणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात. याअंतर्गत शतकोटी वृक्षलावड ही चांगली योजना शासनाने सुरू केली आहे. काही ठिकाणी कागदावरच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिकांनी केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वृक्षलागवड जरी जून, जुलै महिन्यात करण्यात येत असली तरी यासाठी खड्डे खोदणे व इतर प्राथमिक कामे एप्रिलपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. आता जुलैचा महिना पूर्णत्वास जात आहे. मात्र काही गावांमध्ये वृक्षारोपणासाठी अद्यापही खड्डेच खोदण्यात आलेली नाहीत. यामुळे या योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. दरवर्षी विविध विभागाकडून वृक्षारोपण केले जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. परंतु लावलेली किती झाडे जगली, याचे मूल्यमापन अर्थात आॅडिट होत नसल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिक करीत आहेत. यावर्षी पुन्हा शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट प्रत्येक गावाला देण्यात आलेले आहे. मागील वर्षी काही गावांमध्ये या योजनेची प्रत्यक्षात अंमलबाजावणी झाली काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. जंगल तोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, पाण्याची घटती पातळी अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणाबाबत पुढाकार घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र बोटावर मोजण्या इतक्या गावातच योजना यशस्वी होते. काही गावांत मागील वर्षीच्या खड्ड्यातच अथवा कागदावर दाखविलेल्या कागदाच्या खड्ड्यात वृक्षारोपण केले जाते, असे अनेकांचे म्हणणे आहे. यावर्षी पुन्हा वृक्षलागवडीचा बिगूल वाजविण्यात येत आहे. मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती झाडे जिवंत आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. यावर्षीचे पुन्हा उद्दिष्ट देण्यात आले असून पुन्हा शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जातील, असा अंदाज गावकरी लावत आहेत. (तालुका प्रतिनिधी)