शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड खड्ड्यांविना अडली

By admin | Updated: July 21, 2015 00:19 IST

पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे.

योजनेचा फज्जा : पावसाळा संपतोय, खड्डे खोदणार तरी कधी ? चांदूरबाजार : पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे. पण तसे झाले नाही. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी पुन्हा वृक्षारोपणाचा बिगूल वाजला आहे. या योजनेसाठी योग्य आकारमानात एप्रिल महिन्यात खड्डे खोदणे अपेक्षित होते. पण, काही गावांमध्ये अद्यापही याप्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. शासनातर्फे पर्यावरणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात. याअंतर्गत शतकोटी वृक्षलावड ही चांगली योजना शासनाने सुरू केली आहे. काही ठिकाणी कागदावरच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिकांनी केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वृक्षलागवड जरी जून, जुलै महिन्यात करण्यात येत असली तरी यासाठी खड्डे खोदणे व इतर प्राथमिक कामे एप्रिलपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. आता जुलैचा महिना पूर्णत्वास जात आहे. मात्र काही गावांमध्ये वृक्षारोपणासाठी अद्यापही खड्डेच खोदण्यात आलेली नाहीत. यामुळे या योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. दरवर्षी विविध विभागाकडून वृक्षारोपण केले जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. परंतु लावलेली किती झाडे जगली, याचे मूल्यमापन अर्थात आॅडिट होत नसल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिक करीत आहेत. यावर्षी पुन्हा शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट प्रत्येक गावाला देण्यात आलेले आहे. मागील वर्षी काही गावांमध्ये या योजनेची प्रत्यक्षात अंमलबाजावणी झाली काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. जंगल तोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, पाण्याची घटती पातळी अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणाबाबत पुढाकार घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र बोटावर मोजण्या इतक्या गावातच योजना यशस्वी होते. काही गावांत मागील वर्षीच्या खड्ड्यातच अथवा कागदावर दाखविलेल्या कागदाच्या खड्ड्यात वृक्षारोपण केले जाते, असे अनेकांचे म्हणणे आहे. यावर्षी पुन्हा वृक्षलागवडीचा बिगूल वाजविण्यात येत आहे. मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती झाडे जिवंत आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. यावर्षीचे पुन्हा उद्दिष्ट देण्यात आले असून पुन्हा शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जातील, असा अंदाज गावकरी लावत आहेत. (तालुका प्रतिनिधी)