शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

वृक्षलागवड खड्ड्यांविना अडली

By admin | Updated: July 21, 2015 00:19 IST

पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे.

योजनेचा फज्जा : पावसाळा संपतोय, खड्डे खोदणार तरी कधी ? चांदूरबाजार : पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत जागरुकता होणे आवश्यक आहे. पण तसे झाले नाही. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी पुन्हा वृक्षारोपणाचा बिगूल वाजला आहे. या योजनेसाठी योग्य आकारमानात एप्रिल महिन्यात खड्डे खोदणे अपेक्षित होते. पण, काही गावांमध्ये अद्यापही याप्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. शासनातर्फे पर्यावरणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात. याअंतर्गत शतकोटी वृक्षलावड ही चांगली योजना शासनाने सुरू केली आहे. काही ठिकाणी कागदावरच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिकांनी केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वृक्षलागवड जरी जून, जुलै महिन्यात करण्यात येत असली तरी यासाठी खड्डे खोदणे व इतर प्राथमिक कामे एप्रिलपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. आता जुलैचा महिना पूर्णत्वास जात आहे. मात्र काही गावांमध्ये वृक्षारोपणासाठी अद्यापही खड्डेच खोदण्यात आलेली नाहीत. यामुळे या योजनेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. दरवर्षी विविध विभागाकडून वृक्षारोपण केले जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. परंतु लावलेली किती झाडे जगली, याचे मूल्यमापन अर्थात आॅडिट होत नसल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व नागरिक करीत आहेत. यावर्षी पुन्हा शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट प्रत्येक गावाला देण्यात आलेले आहे. मागील वर्षी काही गावांमध्ये या योजनेची प्रत्यक्षात अंमलबाजावणी झाली काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे, असेही अनेकांचे म्हणणे आहे. जंगल तोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, पाण्याची घटती पातळी अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणाबाबत पुढाकार घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र बोटावर मोजण्या इतक्या गावातच योजना यशस्वी होते. काही गावांत मागील वर्षीच्या खड्ड्यातच अथवा कागदावर दाखविलेल्या कागदाच्या खड्ड्यात वृक्षारोपण केले जाते, असे अनेकांचे म्हणणे आहे. यावर्षी पुन्हा वृक्षलागवडीचा बिगूल वाजविण्यात येत आहे. मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टांपैकी किती झाडे जिवंत आहेत याचाही विचार होणे गरजेचे आहे. यावर्षीचे पुन्हा उद्दिष्ट देण्यात आले असून पुन्हा शासनाचे कोट्यवधी रुपये मातीत जातील, असा अंदाज गावकरी लावत आहेत. (तालुका प्रतिनिधी)