शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वन महोत्सवात शाळेच्या आवारात होणार वृक्ष लागवड

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

यंदाच्या पावसाळ्यात १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात वन महोत्सव आयोजित केला आहे.

१ ते ७ जुलैदरम्यान उपक्रम : जिल्हास्तरीय समितीचे राहणार सनियंत्रणअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात वन महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी सर्व शाळांच्या आवारात व क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात वृक्ष लावगड करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंत्रणेला दिले आहेत.वैश्विक उष्णतेचे वाढणारे प्रमाण व हवामानातील बदल याची तीव्रता व परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा प्रभावीपणे उपयोग होणार आहे. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने विविध विभाग व जनतेच्या सहभागातून यंदाच्या पावसाळ्यात वन महोत्सव कालावधीमध्ये १ जुलै २०१६ रोजी या एका दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे शासनाने ठरविले आहे.शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबतच्या निकषांमध्ये शाळेच्या आवारात मोठ्या झाडांची लागवड सावलीसाठी करण्याचा अंतर्भाव आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी जैनविविधता, दुर्मिळ अशा वनसंसदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत संस्कारक्षम व यात जाणीव आणि आवड निर्माण व्हावी यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत शाळांमध्ये वृक्षारोपण योजना व अन्य कार्यक्रम राबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना परिपत्रक जारी केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पूर्व पावसाळी कामे विहीत कालावधीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आहेत. प्रचलीत निकषाप्रमाणे खड्डे तयार करणे, माती, खत, कीटकनाशके भरून रोपे लागवडीसाठी तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. वन आणि सामाजिक वनीकरण योजनेंतर्गत मनरेगा, रोहयो, वनमहोत्सव आणि कॅम्पांतर्गत तयार केलेल्या रोप वाटीकेतून पुरेशा संख्येने दर्जेदार, गुणवत्तापूर्ण सुदृढ उंचीची रोपे ३० जूनपर्यंत उपलब्ध करून घ्यावीत व कृषी विभागाच्या रोपवाटिकेमध्ये रोपे उपलब्ध असल्यास तेथून ही प्राप्त करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळांच्या आवारात रोपांची लागवडस्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवारात तसेच खासगी अनुदानित विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळांच्या आवारात २० रोपांची लागवड करण्यासंबंधी शाळेस उच्च माध्यमिक शाळा संलग्न असल्यास ३० रोपांची किंवा २० पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात यावी, असे निर्देश आहेत.दर दोन तासांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादरया कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी अंमलबजावणी यंत्रणा व जिल्हा स्तरावरील समन्वयन अधिकारी यांनी प्रत्येक दोन तासांनी जिल्ह्याचा वृक्ष लागवडीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत वृक्ष लागवडीची माहिती छायाचित्रासह संगणक प्रणालीवर तत्काळ करावी. त्यामध्ये लागवड केलेल्या रोपांची संख्या व प्रजाती तसेच वृक्ष लागवडीबाबतची संबंधितांचा सहभाग याचा तपशील अंतर्भूत करण्याचे निर्देश आहेत.रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्के असावेउपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व दृश्य परिणाम दिसून येण्यासाठी रोपांचे संवर्धन, पाणीपुरवठा, रोपांचे जनांवरापासून सरंक्षण होण्यासाठी जैविक किंवा तारांचे किंवा प्लास्टिकचे कुंपण, रोपांची कायमस्वरुपी देखभाल, निगा, संगोपन आदी कामांचे नियोजन करुन आराखडा तयार करावा व त्यानुसार कार्यवाही करावी, वृक्ष लागवड केल्यावर रोपांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश ओत.या रोपांची करणार लागवडहवामान, पाण्याची उपलब्धता व भौतिक परिस्थिती विचारात घेऊन सावली देणारे शोभिवंत, फळ फळावर देणारे या वृक्ष प्रजातीची प्राधान्याने लागवड करावी यामध्ये आंबा, चिकू, आवळा, कवठ,काजू, फणस, वड, पिंपळ, नीम, पळस, रेन ट्री, गुलमोहर आणि चाफा आदी रोपांची लागवड करावी, असे निर्देश आहेत.