शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

वन महोत्सवात शाळेच्या आवारात होणार वृक्ष लागवड

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

यंदाच्या पावसाळ्यात १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात वन महोत्सव आयोजित केला आहे.

१ ते ७ जुलैदरम्यान उपक्रम : जिल्हास्तरीय समितीचे राहणार सनियंत्रणअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात वन महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी सर्व शाळांच्या आवारात व क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात वृक्ष लावगड करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंत्रणेला दिले आहेत.वैश्विक उष्णतेचे वाढणारे प्रमाण व हवामानातील बदल याची तीव्रता व परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा प्रभावीपणे उपयोग होणार आहे. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने विविध विभाग व जनतेच्या सहभागातून यंदाच्या पावसाळ्यात वन महोत्सव कालावधीमध्ये १ जुलै २०१६ रोजी या एका दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे शासनाने ठरविले आहे.शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबतच्या निकषांमध्ये शाळेच्या आवारात मोठ्या झाडांची लागवड सावलीसाठी करण्याचा अंतर्भाव आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी जैनविविधता, दुर्मिळ अशा वनसंसदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत संस्कारक्षम व यात जाणीव आणि आवड निर्माण व्हावी यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत शाळांमध्ये वृक्षारोपण योजना व अन्य कार्यक्रम राबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना परिपत्रक जारी केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पूर्व पावसाळी कामे विहीत कालावधीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आहेत. प्रचलीत निकषाप्रमाणे खड्डे तयार करणे, माती, खत, कीटकनाशके भरून रोपे लागवडीसाठी तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. वन आणि सामाजिक वनीकरण योजनेंतर्गत मनरेगा, रोहयो, वनमहोत्सव आणि कॅम्पांतर्गत तयार केलेल्या रोप वाटीकेतून पुरेशा संख्येने दर्जेदार, गुणवत्तापूर्ण सुदृढ उंचीची रोपे ३० जूनपर्यंत उपलब्ध करून घ्यावीत व कृषी विभागाच्या रोपवाटिकेमध्ये रोपे उपलब्ध असल्यास तेथून ही प्राप्त करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळांच्या आवारात रोपांची लागवडस्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवारात तसेच खासगी अनुदानित विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळांच्या आवारात २० रोपांची लागवड करण्यासंबंधी शाळेस उच्च माध्यमिक शाळा संलग्न असल्यास ३० रोपांची किंवा २० पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात यावी, असे निर्देश आहेत.दर दोन तासांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादरया कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी अंमलबजावणी यंत्रणा व जिल्हा स्तरावरील समन्वयन अधिकारी यांनी प्रत्येक दोन तासांनी जिल्ह्याचा वृक्ष लागवडीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत वृक्ष लागवडीची माहिती छायाचित्रासह संगणक प्रणालीवर तत्काळ करावी. त्यामध्ये लागवड केलेल्या रोपांची संख्या व प्रजाती तसेच वृक्ष लागवडीबाबतची संबंधितांचा सहभाग याचा तपशील अंतर्भूत करण्याचे निर्देश आहेत.रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्के असावेउपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व दृश्य परिणाम दिसून येण्यासाठी रोपांचे संवर्धन, पाणीपुरवठा, रोपांचे जनांवरापासून सरंक्षण होण्यासाठी जैविक किंवा तारांचे किंवा प्लास्टिकचे कुंपण, रोपांची कायमस्वरुपी देखभाल, निगा, संगोपन आदी कामांचे नियोजन करुन आराखडा तयार करावा व त्यानुसार कार्यवाही करावी, वृक्ष लागवड केल्यावर रोपांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश ओत.या रोपांची करणार लागवडहवामान, पाण्याची उपलब्धता व भौतिक परिस्थिती विचारात घेऊन सावली देणारे शोभिवंत, फळ फळावर देणारे या वृक्ष प्रजातीची प्राधान्याने लागवड करावी यामध्ये आंबा, चिकू, आवळा, कवठ,काजू, फणस, वड, पिंपळ, नीम, पळस, रेन ट्री, गुलमोहर आणि चाफा आदी रोपांची लागवड करावी, असे निर्देश आहेत.