शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वनविभागाला डावलून समृद्धी महामार्गावर वृक्षलागवडीचा खटाटोप

By गणेश वासनिक | Updated: May 9, 2023 22:50 IST

११ लाख वृक्षलागवडीसाठी नेमली एजन्सी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रताप, झाडांविना मार्ग झाला भकास

अमरावती : युती शासनाच्या काळात राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा विक्रम करण्यात आला. परिमाणी, चार ते पाच टक्के जमीन वृक्षाच्छादनाखाली आलेली आहे. असे असताना बाळासाहेब ठाकरे समृद्धी राष्ट्रीय महामार्गालगत ११ लाख वृक्षलागवड करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली गेली आहे. वृक्षलागवडीसाठी राज्याचा वनविभाग असताना बाहेरील एजन्सी नियुक्त करण्याचा खटाटोप का?, हा सवाल उपस्थित होत आहे.

समृद्धी महामार्ग पर्यावरणपूरक करण्याचा मानस असला तरी फेज वनच्या ५२० किमीपर्यंत वृक्षलागवड नसल्याने या महामार्गावरून प्रवास करताना डोळ्यासमोर शीतल सावलीचा अभाव दिसून येतो. सात महिने लोटल्यानंतर ही महामार्गावर उंच रोपे लावण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे. समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा समृद्धी हायवे शिर्डीपर्यंत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते डिसेंबर २०२२ मध्ये प्रवासाकरिता खुला करण्यात आला. सिमेंटच्या या रस्त्यावर उन्हाच्या चटक्यामुळे वाहनाचे टायर फुटून अपघात होत असल्याने दोष टायरांवर दिला जात आहे. हायवेला शीतल करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या अधिग्रहीत जमिनीवर सिमेंटच्या भिंतीचे आवरण तयार करण्यात आले. मात्र, त्यावर वृक्षांचा पत्ता नाही. परिणामी, हा महामार्ग भकास दिसून येत आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी वनविभाग असताना एमएसआरडीसीने वृक्षलागवडीसाठी खासगी एजन्सी नेमली आहे.समृद्धी महामार्गालगत वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत वरिष्ठ स्तरावर धोरण ठरविले आहे. वाशिम, वर्धा, छत्रपती संभाजीनगर या भागात वृक्ष लागवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही ती लवकरच एजन्सीच्या माध्यमातून राबविली जाईल. देखरेख व नियंत्रणासाठी अभियंता नेमला जाईल. - गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, अमरावती.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAmravatiअमरावती