शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

वनविभागाला डावलून समृद्धी महामार्गावर वृक्षलागवडीचा खटाटोप

By गणेश वासनिक | Updated: May 9, 2023 22:50 IST

११ लाख वृक्षलागवडीसाठी नेमली एजन्सी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रताप, झाडांविना मार्ग झाला भकास

अमरावती : युती शासनाच्या काळात राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा विक्रम करण्यात आला. परिमाणी, चार ते पाच टक्के जमीन वृक्षाच्छादनाखाली आलेली आहे. असे असताना बाळासाहेब ठाकरे समृद्धी राष्ट्रीय महामार्गालगत ११ लाख वृक्षलागवड करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली गेली आहे. वृक्षलागवडीसाठी राज्याचा वनविभाग असताना बाहेरील एजन्सी नियुक्त करण्याचा खटाटोप का?, हा सवाल उपस्थित होत आहे.

समृद्धी महामार्ग पर्यावरणपूरक करण्याचा मानस असला तरी फेज वनच्या ५२० किमीपर्यंत वृक्षलागवड नसल्याने या महामार्गावरून प्रवास करताना डोळ्यासमोर शीतल सावलीचा अभाव दिसून येतो. सात महिने लोटल्यानंतर ही महामार्गावर उंच रोपे लावण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे. समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा समृद्धी हायवे शिर्डीपर्यंत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते डिसेंबर २०२२ मध्ये प्रवासाकरिता खुला करण्यात आला. सिमेंटच्या या रस्त्यावर उन्हाच्या चटक्यामुळे वाहनाचे टायर फुटून अपघात होत असल्याने दोष टायरांवर दिला जात आहे. हायवेला शीतल करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या अधिग्रहीत जमिनीवर सिमेंटच्या भिंतीचे आवरण तयार करण्यात आले. मात्र, त्यावर वृक्षांचा पत्ता नाही. परिणामी, हा महामार्ग भकास दिसून येत आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी वनविभाग असताना एमएसआरडीसीने वृक्षलागवडीसाठी खासगी एजन्सी नेमली आहे.समृद्धी महामार्गालगत वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत वरिष्ठ स्तरावर धोरण ठरविले आहे. वाशिम, वर्धा, छत्रपती संभाजीनगर या भागात वृक्ष लागवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही ती लवकरच एजन्सीच्या माध्यमातून राबविली जाईल. देखरेख व नियंत्रणासाठी अभियंता नेमला जाईल. - गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, अमरावती.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAmravatiअमरावती