शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वृक्षारोपण ठप्प, ५६८ कोटींचा निधी वापरात न येता वाया जाण्याची शक्यता

By गणेश वासनिक | Updated: June 2, 2025 12:54 IST

Amravati : गतवर्षीपासून वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष; अभिसरण योजनेचे निकष हिरवळीला बाधक

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्रात केवळ १७ टक्के एवढेच वृक्ष आच्छादन असल्याचा अहवाल केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. ही बाब राज्यासाठी अतिशय धोकादायक असून, गतवर्षीपासून वृक्षारोपणाची कामे ठप्प आहेत. जून महिना उजाडला असताना, वृक्ष लागवडीची कामे हाती घेण्यात आली नाहीत. तर, दुसरीकडे सामाजिक वनीकरण आणि वन विभाग प्रादेशिकच्या रोपवाटिकेत 3 कोटी १७लाख ८० हजार रोपे वृक्षलागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. यात शून्य ते ९, ९ ते १८ आणि १८ महिन्यांवरील रोपांचा समावेश आहे.

अभिसरण योजनेमुळे बट्ट्याबोळ राज्यात वन विभागात गतवर्षीपासून अभिसरण योजना लागू करण्यात आली. मात्र, रोहयोतून कामे आणि जाचक अटींमुळे वन विभागात अभिसरण योजना जणू फेल झाल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात निधी मंजूर असला, तरी यातून यंदा वृक्षारोपणाची एकही कामे घेण्यात आली नाहीत. तर, मागील वर्षी अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यातून प्रथम वर्षाची कामे न झाल्याने निधी परत गेला, हे विशेष. राज्य शासनाचे २४०४९२ या योजनेकडे दुर्लक्ष चालविले आहे.

चालू आर्थिक वर्षात ५६८ कोटींचा निधी मंजूरराज्य शासनाने सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम, महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांचे हरितीकरण आणि रस्ते, कालवे व रेल्वे लाइन यांचे दुतर्फा वृक्ष लागवड करणे या वृक्षलावगडीच्या प्रमुख तीन महत्त्वाच्या योजनांसाठी ५६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या योजनेसाठी एकाही वनवृत्तातून प्रस्ताव सादर नसल्याची माहिती आहे.

वनवृत्तनिहाय रोपांची माहिती(प्रादेशिक घटक)अमरावती - ९,७५,१८८चंद्रपूर - १७,५७,५६०छत्रपती संभाजी नगर - ४८,३९,२५६धुळे - १४,०७,४४५गडचिरोली - १७,८०,६९४कोल्हापूर - ५,३३,३९५नागपूर - १०,९२,९५१नाशिक - १६,६५,७३२पुणे - २२,१८,२८२ठाणे - ६,५७,४२३यवतमाळ - १९,३९,५८२एकूण -  १,८८,६७,५०८

सामाजिक वनीकरण घटकअमरावती - २४,७२,९९६नागपूर - २२,४४,५२१नाशिक - ३२,६८,८१४पुणे - १५,६१,६१५छत्रपती संभाजीनगर - २९,०३,१५९ठाणे - ४,६१,९४०एकूण - १,२९,१३,०४५

"अभिसरण योजनतेन वनीकरणाची कामे ही 'एमआरजीएस'मधून करावी लागणार आहे. बजेटमध्ये तरतूद, निधीची मंजुरी अशा अनेक स्थानिक समस्या आहेत. त्यामुळे वृक्ष लागवड, वनीकरणाच्या कामांचे प्रस्ताव कमी येत असावे."- डब्ल्यू. आय. याटबॉन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण पुणे) 

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र