शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

कोरोनाकाळात ३७४ कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

महिला, बाल कल्याण अंगणवाडी केंद्रात सुविधा अमरावती : कोरोनाकाळात अंगणवाड्यांच्या कामकाजावर परिणाम झाला तरी कुपोषित बालकांच्या योजना आणि त्यांच्यावर ...

महिला, बाल कल्याण अंगणवाडी केंद्रात सुविधा

अमरावती : कोरोनाकाळात अंगणवाड्यांच्या कामकाजावर परिणाम झाला तरी कुपोषित बालकांच्या योजना आणि त्यांच्यावर नियमित उपचार या काळातही सुरू होते. गतवर्षी २ हजार १४४ चिमुकल्यांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २ हजार ८२ बालकांचे श्रेणीवर्धन झाले आहे. यामध्ये मध्यम कुपोषित (मॅम) आणि तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीतील मुलांना ३० दिवसांकरिता दररोज सात ते आठ वेळा पौष्टिक आहार व औषधोपचार देऊन त्यांचे श्रेणीवर्धन झाले आहे.

मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन आदिवासीबहुल तालुक्यांतील एकूण ४७९ अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्रे सुरू करून यामध्ये २१४४ मुले दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी २०८२ मुलांचे श्रेणीवर्धन झाले आहे तसेच जिल्ह्यात १०३७ सॅम मुलांसाठी एनर्जी डेन्स न्यूट्रीशियस फूड (ईडीएआय) बाल विकास केंद्रे सुरू करण्यात आली. यात ६६३ मुलांचे श्रेणीवर्धन होऊन ती कुपोषण मुक्त झाली आहेत. ग्राम बाल विकास केंद्रात दाखल बालकांचे वजनात वाढ न झाल्यास सीटीसी व एनआयसीमध्ये दाखल करण्यात येत आहे.

गत जानेवारीमध्ये १५ सीटीसी केंद्रांमध्ये ५८ सॅम व ६ मॅम मुलांना दाखल करण्यात आले. यापैकी ५४ मुलांचे श्रेणीवर्धन झाले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागांंतर्गत बाल व मातांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या आधी माता व बालकांना अंगणवाडीत शिजविलेला आहार दिला जात होता. परंतु, कोरोना काळामध्ये बालके आहारापासून वंचित राहू नये, याकरिता कच्चे धान्य घरपोच दिले जात आहे.

मेळघाटात भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू असून, गरोदर स्त्री व स्तनदा मातांना अंगणवाडी सेविकेमार्फत घरपोच डबे दिले जातात. बालकाला आठवड्यातून चार दिवस व महिन्यातून १६ दिवस अंडी दिली जातात. कोरोनाकाळात आहाराचे नियमित वाटप सुरूच आहे. अंगणवाडी सेविकांकडून बालकांचे वजन-उंचीचे मोजमाप नियमित घेतले जात आहे. अंगणवाडी सेविकांकडून बालकांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.

बॉक्स

कोणत्या वर्षात किती कुपोषितांवर उपचार

२०१६- १०७८

२०१७-२२०७

२०१८-२१७४

२०१९-३०८४

२०२०-३१०९

बॉक्स

पाच वर्षांत ७५८० बालके कुपोषणमुक्त

मेळघाटसह जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत ग्राम विकास केंद्रांत उपचाराकरिता एकूण ११६५२ सॅम व मॅम श्रेणीतील कुपोषित मुले दाखल झाली होती. यापैकी ७५८० मुले टप्प्यप्प्प्याने कुपोषणमुक्त झाली आहेत.

कोट

कोरोनाकाळातही तीव्र कुपोषित बालकांवर विभागाचे वैयक्तिक लक्ष आहे. त्यांना ग्राम बालविकास केंद्रे, बाल उपचार केंद्रे तसेच गरज पडल्यास एनआरसीमधून मुलांना उपाचार देण्यात येतात.

- प्रशांत थोरात, उपमुख्यर्कायकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण