शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन विश्रामगृहाचे पालटले रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

वनविभागाने दखल घेऊन विश्रामगृहाला जीवदान दिले. ७.५० लाख रुपयांच्या निधीतून दोन सेप्टिक टँक, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, खानसामा, वनमजूर निवासस्थान दुरुस्ती, विद्युतीकरण, उद्यान, तार कम्पाऊंड, पाकगृह आदी सुविधा करून विश्रामगृहाचा कायापालट करण्यात आला. यात वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांचा सिंहाचा वाटा आहे.

ठळक मुद्देमहेंद्री : १०८ वर्षांचा इतिहास, उद्यानासह अत्याधुनिक सुविधा

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर वसलेल्या महेंद्री येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृहाने कात टाकली आहे. १०८ वर्षे जुन्या विश्रामगृहाचे रूपडे पालटल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्या उत्साह द्विगुणित झाला आहे. येथे उद्यानासह अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.वनविभागाने दखल घेऊन विश्रामगृहाला जीवदान दिले. ७.५० लाख रुपयांच्या निधीतून दोन सेप्टिक टँक, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, खानसामा, वनमजूर निवासस्थान दुरुस्ती, विद्युतीकरण, उद्यान, तार कम्पाऊंड, पाकगृह आदी सुविधा करून विश्रामगृहाचा कायापालट करण्यात आला. यात वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांचा सिंहाचा वाटा आहे.ब्रिटिशकाळात १९१२ मध्ये विदेशी पाहुण्यांच्या निवासाकरिता सन १९१२ मध्ये या विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली. या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण शीतल राहावे, याकरिता दगडामध्ये भिंतींची निर्मिती करण्यात आली. छत गवताचे होते. दोराने हलविणारा पंखा आणि ते हलविणारा माणूस तेथे असायचा. प्रकाशाकरिता कंदिल होते. महेंद्री टेकडीवर अमरावती-पांढुर्णा राज्य महामार्गाच्या बाजूलाच हे विश्रामगृह साकारण्यात आले. येथे दोन शयनकक्ष, एक माजघर, एक भोजनकक्ष आहे, तर खानसामा आणि चौकीदारांचेसुद्धा निवासस्थान आहे. सन १९८७-८८ मध्ये विद्युत व्यवस्था येथे आली.इको टुरिझम रखडले, असा झाला बदलसात-आठ वर्षांआधी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी इको-टुरिझमचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मात्र, अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. खानसामा सेवानिवृत्त झाल्यानंतर विश्रामगृहाची फरफट झाली होती.

टॅग्स :Socialसामाजिक