शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा मंत्रालयात

By गणेश वासनिक | Updated: March 5, 2024 18:05 IST

मुख्य वनसंरक्षकांचे अधिकार काढले, बदल्यांमध्ये महसूल विभागाचा निकष आवश्यक, आदेश निर्गमित

गणेश वासनिक, अमरावती : राज्याच्या वन विभागात वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये होणारे अर्थकारण लक्षात घेता आता राज्य शासनाने आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार मंत्रालयाकडे दिले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील गर्दी पुन्हा वाढणार असून, जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या आरएफओंना बदलीच्या अनुषंगाने बाहेर जाण्याचा प्रसंग ओढवणार आहे.

वन विभागात राजपत्रित अधिकारी असणारे आरएफओंच्या बदल्या आणि नियुक्तीचे धोरण राज्य शासन घेत असते. मध्यंतरी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावेळेस आरएफओंच्या बदल्या मंत्रालयातून केल्या जात होत्या. त्यानंतर बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण शिरल्याने वन विभागाला गालबोट लागले. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री झाल्यानंतर आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार प्रधान मुख्य वनसंरक्षक ते मुख्य वनसंरक्षक यांना बहाल करण्यात आले होते. मात्र यातही मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ झाल्याचे दिसून आले. कारण मुख्य वनसंरक्षकांवर निष्ठा ठेवणाऱ्यांना मलाईदार वनपरिक्षेत्र मिळायचे. याबाबत अनेक तक्रारी वाढल्या होत्या, तर बदल्यांसाठी अधिकारी लक्ष्मीदर्शन घडवित वेळप्रसंगी आमदारांचा दबाव आणि हवे असलेले ठिकाण मिळवून घेत होते. आरएफओंच्या बदल्यांमुळे वन विभाग सतत प्रकाश झोतात येत असल्याने अखेर महसूल व वन विभागाने ४ मार्च रोजी आदेश निर्गमित करून मंत्रालयीन समितीच्या माध्यमातून आरएफओंच्या बदल्या करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.समितीत कुणाचा आहे समावेश

यापुढे आरएफओंच्या बदल्या करण्यासाठी वन विभागाने पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. यामध्ये अपर मुख्य सचिव (वने) हे अध्यक्ष राहतील. तर सचिव हे वन विभागाचे उपसचिव आणि सदस्यांमध्ये वनबल प्रमुख, अपर मुख्य वनसंरक्षक (प्रशासन- दुय्यम संवर्ग), उपसचिव आदिवासी विकास विभाग यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. ही समिती आरएफओंच्या बदल्यांसाठी असली तरी आरएफओंच्या बदल्यांचे प्रस्ताव वनबल प्रमुख नागपूर हे पाठवतील. यंदाच्या ह्ंगामात २७५ आरएफओंच्या बदल्या होणार आहेत.

वन प्रशासनाचे पंख छाटले

राज्याच्या वन विभागावर वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची कमांड आहे. मात्र आरएफओच्या बदल्यांसाठी नियुक्त समितीचे अध्यक्ष सचिव (वने) हे आहेत. तर उपसचिवांना सदस्य सचिव करण्यात आले. असे असले तरी वन विभागाचे प्रमुख असलेले वनबल प्रमुख शैलेंद्र टेभुर्णीकर यांना दुय्यमस्थान देण्यात आले आहे. बदल्यांचे प्रस्ताव टेभुर्णीकर हेच पाठविणार असले तरी वन विभागाचे पंख छाटल्या गेलेत, हे विशेष. तसेच आरएफओंच्या बदल्यांमध्ये सीसीएफचे अधिकारदेखील गाेठविले आहेत.आंतर जिल्ह्यात बदली नाहीच

आरएफओंचे पद हे राज्यस्तरीय असताना बदल्या करतेवेळी विभाग किंवा राज्याचा विचार केला जात नाही. परिणामी आरएफओ ईतरत्र न जाता केवळ तालुका बदल करून जिल्ह्यातच ठाण मांडून आहेत. पद राज्यस्तरीय बदलीच्यावेळी महसूल विभागाचा निकष लावल्या जात नाही. मात्र यापुढे गावा-गावात ठाण मांडून बसलेल्या आरएफओंना लक्ष्मीदर्शनासह राजकीय दबाव वापर करण्याची वेळ येणारआहे. पती-पत्नी एकत्रीकरणावर टाच बसणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल