शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पथ्रोटमध्ये मुसळधार; ट्रॅक्टर अर्धे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उगमावर पाण्यात तर काही शहानूर कालव्यामध्ये जात असल्याकारणाने नाल्याला कमरेइतकेच पुराचे पाणी येत होते.

ठळक मुद्देथापेरा नाल्याला पूर : बैलजोडी वाहिली, वस्तीत शिरले पावसाचे पाणी, जनजीवन विस्कळीत, प्रशासनातर्फे नुकसानाचे सर्वेक्षण सुरू

अरूण पटोकार।लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : गुरुवारी दुपारी दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने पथ्रोट गावात हाहाकार उडाला. अलीकडच्या १५ ते २० वर्षांत असा पाऊस अनुभवला नसल्याची प्रतिक्रिया जुण्याजाणत्यांनी दिली. सखल भागात ५ ते ७ फूट पाणी होते. गावातील थापेरा नाल्याच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले. या पाण्यात एक बैलजोडी वाहून गेली. ती शुक्रवारी गावालगत मृतावस्थेत आढळली. गावातील एका चौकात दोन ट्रॅक्टर अर्धे बुडाले होते.गुरूवारी दुपारी ४ च्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सलग दोन तास मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले एकत्र झाले. त्यातच थापेरा नाल्याच्या उगमावर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अचानक आलेल्या नाल्याच्या पुरामध्ये येथील शेतकरी रामदास उपरीकर यांची गोठ्यात बांधलेली बैलजोडी खोडासहित वाहून गेल्यामुळे दोन्ही बैल मरण पावले. खरिपाच्या पावसाळ्यातील भर हंगामात त्यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उगमावर पाण्यात तर काही शहानूर कालव्यामध्ये जात असल्याकारणाने नाल्याला कमरेइतकेच पुराचे पाणी येत होते. मात्र, गुरुवारी झालेल्या पावसामुळे पथ्रोट नाला तुडूंब भरून वाहिल्याने पथ्रोट येथील काही वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पथ्रोटमधील माळीपुरा, जयसिंगपुरा, आंबेडकर चौक, गुजरी लाईन, आर्य समाज चौक, ग्रामसचिवालय व सोसायटीच्या आवारात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले आहे.दुकाने पाण्यातग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने काहींना गावातील मुख्य चौकात हलविता येणारी टिनाची दुकाने देण्यात आली. त्या टपऱ्या अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या. गावाच्या अनेक भागात ५ ते सहा फूट पाणी होते. गावातील झोपडपट्टी परिसराला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी स्थानिक प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली.शहानूर धरणाचा जलसाठा ५१ टक्क्यांवरआठ दिवसांपूर्वी शहानूर नदीच्या उगमावर दमदार पाऊस झाल्याने ४७ टक्के जलसाठा होता. गुरूवारअखेर या धरणातील जलसाठा ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता योगेश मोरे यांनी दिली.जवळापुरातही पाऊसअचलपूर तालुक्यातील जवळापूर गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. गावातील शाळेपर्यंत पावसाचे पाणी साचले होते. शेतशिवारातील नाला फुटल्यामुळे पुराच्या पाण्याने सुनील कडू व त्यांच्या लगतच्या शेतातील पिके खरडून गेली.

टॅग्स :Rainपाऊस