शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा प्रकल्पामधून आज पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: July 4, 2016 00:02 IST

तालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे सोमवार ४ जुलै रोजी धरणामधून १०० क्युरेक्स पाणी सोडण्यात येणार आहे.

पाणीसाठ्यात वाढ : १०० क्युरेक्स पाण्याचा निचरा, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराचांदूरबाजार : तालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे सोमवार ४ जुलै रोजी धरणामधून १०० क्युरेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी धरणाची दारे १० सें.मी.ने उघडण्यात येतील. पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवार २ जुलै रोजी मध्यप्रदेश परिसरात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातील या तारखेच्या नियोजित साठ्यातील पाण्यात वाढ झाल्याने नियमानुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ३ जुलै रोजी नियमानुसार धरणातील पाणीसाठा हा ३० टक्के असायला हवा. परंतु मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे पाणी येण्याचे प्रमाण वाढल्याने हा साठा रविवारी ४५ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी धरणाची दारे १० सें.मी. उघडण्यात येणार असून यामधून प्रति सेकंद १०० घनमीटर पाण्याचा विसर्ग होणार आहे. सुरूवातीला तीन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास टप्प्या-टप्प्याने नऊही दरवाजे १०-१० सेंमिने उघडले जाण्याची शक्यता आहे. पाण्याच्या विसर्गाबाबत, प्रकल्प प्रशासनाकडून महसूल विभागाला कळविण्यात आले असून त्यानुसार स्थानिक महसूल कार्यालयाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात मागील सहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असून सहा दिवसांत तालुक्यात सरासरी ११९ मि.मी. इतका पाऊस झाल्याने परिसरातील नाले ओसंडून वाहात आहेत. पूर्णेचे पाणी गावात शिरल्याने मागील वर्षी परिसरात प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाण्याचा विसर्ग करण्याबाबत गावकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. ठरलेल्या साठ्यापेक्षा जादा पाणी धरणात साठवता येत नाही. त्यामुळे त्या पाण्याचा विसर्ग करावा लागतो. सोडलेले पाणी नदीपात्रातच राहील. सावधगिरी म्हणून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.- आशिष राऊत,डेप्युटी इंजिनिअर, पूर्णा प्रकल्पधरणातील पाण्याचा १०० क्युरेक्स विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून मिळाली. त्याप्रमाणे ३ जुलैलाच मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांमार्फत नदीकाठावरील गावांना पुराच्या पाण्यापासून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. - शिल्पा बोबडे,तहसीलदार, चांदूरबाजार.