शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

राज्यात ४५० च्या वर पोहोचले वाघ; मात्र व्याघ्र प्रकल्प केवळ सहाच

By गणेश वासनिक | Updated: December 16, 2024 18:45 IST

जुन्याच व्याघ्र प्रकल्पांच्या भरवशावर कारभार : वाघांनी क्षेत्र सोडले, वन्यजीव-मनुष्य यांच्यात संघर्षाची ठिगणी

अमरावती : राज्यात केवळ सहा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. विदर्भात वाघांची वाढलेली संख्या बघता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी दोन व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती हाेणे काळाची गरज आहे. मात्र, याबाबत वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाही. विदर्भात वाघांसाठी कॅरिडॉर तयार करणेचे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर आणि ताडोबा हे पाच विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात चार व्याघ्र प्रकल्प हे १९७५ पासून निर्माण करण्यात आले आहेत. विदर्भात वाघांची संख्या ४५०च्या घरात पाेहोचली आहे. यापैकी १०० च्या आसपास वाघ हे व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर वास्तव्यास दिसून येतात. परिणामी वाघ आणि मनुष्य हा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत आतापर्यंत १२ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. विदर्भात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपुरातून १५ वाघ हे गुजरात राज्यात पाठविले जाणार होते. मात्र, यास पुढे गती मिळाली नाही. वनविभाग याबाबत सकारात्मक नव्हता, हे विशेष.

"नवीन व्याघ्र प्रकल्प निर्मितीबाबत शासनाचे असे काही धाेरण नाही. मात्र, वाघांच्या वास्तव्यास सुरक्षिततेसाठी कॅरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातून वाघ स्थलांतर करताना तो सुरक्षित असेल."- आदर्श रेड्डी, वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवAmravatiअमरावती