शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४५० च्या वर पोहोचले वाघ; मात्र व्याघ्र प्रकल्प केवळ सहाच

By गणेश वासनिक | Updated: December 16, 2024 18:45 IST

जुन्याच व्याघ्र प्रकल्पांच्या भरवशावर कारभार : वाघांनी क्षेत्र सोडले, वन्यजीव-मनुष्य यांच्यात संघर्षाची ठिगणी

अमरावती : राज्यात केवळ सहा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. विदर्भात वाघांची वाढलेली संख्या बघता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी दोन व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती हाेणे काळाची गरज आहे. मात्र, याबाबत वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाही. विदर्भात वाघांसाठी कॅरिडॉर तयार करणेचे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर आणि ताडोबा हे पाच विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात चार व्याघ्र प्रकल्प हे १९७५ पासून निर्माण करण्यात आले आहेत. विदर्भात वाघांची संख्या ४५०च्या घरात पाेहोचली आहे. यापैकी १०० च्या आसपास वाघ हे व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर वास्तव्यास दिसून येतात. परिणामी वाघ आणि मनुष्य हा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत आतापर्यंत १२ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. विदर्भात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपुरातून १५ वाघ हे गुजरात राज्यात पाठविले जाणार होते. मात्र, यास पुढे गती मिळाली नाही. वनविभाग याबाबत सकारात्मक नव्हता, हे विशेष.

"नवीन व्याघ्र प्रकल्प निर्मितीबाबत शासनाचे असे काही धाेरण नाही. मात्र, वाघांच्या वास्तव्यास सुरक्षिततेसाठी कॅरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातून वाघ स्थलांतर करताना तो सुरक्षित असेल."- आदर्श रेड्डी, वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवAmravatiअमरावती