शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

राज्यात ४५० च्या वर पोहोचले वाघ; मात्र व्याघ्र प्रकल्प केवळ सहाच

By गणेश वासनिक | Updated: December 16, 2024 18:45 IST

जुन्याच व्याघ्र प्रकल्पांच्या भरवशावर कारभार : वाघांनी क्षेत्र सोडले, वन्यजीव-मनुष्य यांच्यात संघर्षाची ठिगणी

अमरावती : राज्यात केवळ सहा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. विदर्भात वाघांची वाढलेली संख्या बघता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी दोन व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती हाेणे काळाची गरज आहे. मात्र, याबाबत वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाही. विदर्भात वाघांसाठी कॅरिडॉर तयार करणेचे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर आणि ताडोबा हे पाच विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात चार व्याघ्र प्रकल्प हे १९७५ पासून निर्माण करण्यात आले आहेत. विदर्भात वाघांची संख्या ४५०च्या घरात पाेहोचली आहे. यापैकी १०० च्या आसपास वाघ हे व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर वास्तव्यास दिसून येतात. परिणामी वाघ आणि मनुष्य हा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत आतापर्यंत १२ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. विदर्भात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. चंद्रपुरातून १५ वाघ हे गुजरात राज्यात पाठविले जाणार होते. मात्र, यास पुढे गती मिळाली नाही. वनविभाग याबाबत सकारात्मक नव्हता, हे विशेष.

"नवीन व्याघ्र प्रकल्प निर्मितीबाबत शासनाचे असे काही धाेरण नाही. मात्र, वाघांच्या वास्तव्यास सुरक्षिततेसाठी कॅरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातून वाघ स्थलांतर करताना तो सुरक्षित असेल."- आदर्श रेड्डी, वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवAmravatiअमरावती