शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

केरळमधून व्याघ्रांचे मिशन ‘टू एक्स’ क्षेत्रसंचालकांचे मंथन, वाघांची संख्या दुपटीने वाढविण्यावर भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:13 IST

 - गणेश वासनिक अमरावती -  जगाच्या पाठीवर भारतात वाघांची संख्या दुप्पट करण्यासोबतच ३३ टक्के जंगल वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मिशन ‘टू एक्स’ निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने केरळ येथे देशभरातील ४१ व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांची नुकतीच मंथन बैठक पार पडली. संयुक्त राष्ट्रसंघाने जंगलातील वाघांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी २९ देशांवर विशेषत्वाने जबाबदारी ...

 - गणेश वासनिक अमरावती -  जगाच्या पाठीवर भारतात वाघांची संख्या दुप्पट करण्यासोबतच ३३ टक्के जंगल वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मिशन ‘टू एक्स’ निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने केरळ येथे देशभरातील ४१ व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांची नुकतीच मंथन बैठक पार पडली. संयुक्त राष्ट्रसंघाने जंगलातील वाघांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी २९ देशांवर विशेषत्वाने जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी रशियाच्या सेंट पिटरबर्ग येथे वाघांचे वास्तव्य असलेल्या देशांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक घेण्यात आली होती. मात्र, आता  सन- २०२० मध्ये वाघांचे वास्तव्य असलेल्या देशांच्या प्रतिनिधींची दुसरी बैठक भारतात दिल्ली येथे घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रांची वस्तुस्थिती, व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणात येणाºया अडचणी जाणून घेत आहेत. सप्टेंबर महिन्यात केरळ येथे पार पडलेल्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालकांच्या मंथन बैठकीत व्याघ्र प्रकल्पनिहाय वाघांच्या आकडेवारीवर नजर टाकण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री, केरळचे वनमंत्री, प्रधान वनसचिव आदींनी हजेरी लावली. या बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविल्यानुसार जंगलातील वाघांची संख्या दुप्पट करण्याविषयी उपाययोजनांवर मंथन झाले. यापूर्वी सन २०१४ मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेनुसार देशात २०२६ इतके वाघ असल्याची नोंद आहे. परंतु व्याघ्रांच्या संख्येत दुपटीने वाढ कशी करता येईल, याबाबत ४१ क्षेत्रसंचालकांनी उपाययोजना सूचविल्यात. यापुढे  व्याघ्रगणना ही सन २०१८ मध्ये होणार असून व्याघ्रगणनेनंतर वाघांची संख्या पाच हजारांच्या घरात पोहचावी, त्यानुसार सर्वांगीण प्रयत्न करण्याविषयी चर्चा झाली. जंगलाचे संरक्षण करताना वन्यजीवांचे  संरक्षणदेखील महत्त्वाचे आहे. 

केरळमध्ये क्षेत्रसंचालकांच्या मंथन बैठकीत केंद्र सरकारचे व्याघ्र मिशन ‘टू एक्स’ यशस्वी करण्यावर भर देण्यात आला आहे. वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांना विविध उपाययोजना मंजूर झाल्या आहेत.- एम.एस. रेड्डी,क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

‘फांऊडेशन’चे व्याघ्र संवर्धनाला बळजंगलातील पट्टेदार वाघांचे संवर्धन व्हावे, यासाठी युनोने विशेष निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन, संरक्षण करताना आता उद्योजक, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पात ‘फाऊंडेशन’ निधी उभारून त्याद्वारे व्याघ्रांचे संवर्धन आणि जंगलांचे जतन केले जाणार आहे.