शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

करवार गावालगत वाघाने केली गाईची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST

पान २ ची लिड वाघाचा फोटो टाकणे लिंगा/वरूड : तालुक्यातील करवार येथील शेतकरी शनिवारी रात्री शेतातून बैलजोडी व ...

पान २ ची लिड

वाघाचा फोटो टाकणे

लिंगा/वरूड : तालुक्यातील करवार येथील शेतकरी शनिवारी रात्री शेतातून बैलजोडी व गाय घरी आणत असताना, मागच्या मागेच गाय गायब झाली. पाहावयास गेले असता, वाघाने गायीची शिकार केल्याचे लक्षात आले. ही घटना रात्री ९ च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते. तीन दिवसांत वाघाने दोन शिकारी केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

करवार गावालगत सुधाकर कुमरे यांचे शेत आहे. हा जंगलव्याप्त परिसर असून, हिंस्त्र पशू वावरत असतात. ३ एप्रिल रोजी रात्री शेतातून बैलजोडी आणि गाय घरी आणत असताना, अचानक कुमरे यांची गाय मागे राहून गेली. घरी आल्यावर गाय दिसली नाही म्हणून गाईचा शोध घेण्यास ते गेले असता, गाय मृतवस्थेत दिसून आली. ३१ मार्चलासुद्धा लिंगा बीटमधे वाघाने एका गाईसह कालवडीचीे शिकार केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

कोट

लिंगा परिसरात वाघाने गाईची शिकार केली होती. पुन्हा करवार परिसरात शिकार केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री शेतावर जाणे टाळावे. सावध राहून शेतावर काम करावे. उन्हाळ्यामध्ये हिंस्त्र पशूचा वावर वाढत असल्याने काळजी घ्यावी.

- प्रशांत लांबाडे, वनाधिकारी, वरूड

-------------

मांजरखेड कसबा परिसरात वाघाने फस्त केले वासरू

वनविभागाला निवेदन : नुकसानभरपाईसह वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड कसबा परिसरात वाघाने गाईचे वासरू खाल्ल्यामुळे त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी भारत केशवराव बोबडे यांनी शनिवारी चांदूर रेल्वे वनविभागाला एका निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील मांजरखेड (कसबा) - तरोडा शिवारात भारत बोबडे यांचे शेत आहे. या शेतात गाईचा गोठा असून, तिथे जनावरे बांधलेली असतात. १ एप्रिल रोजी रात्री गोठ्यातील एक वासरू ओढत नेऊन वाघाने त्याची शिकार केली. २ एप्रिल रोजी रोजी भारत बोबडे शेतात गेले असता, गोठ्यातुन वासरू कोणी तरी घेऊन गेल्याची शंका मनात आल्याने त्यांनी थोडा शोध घेतला. शेतामध्ये वासराला ओढत नेल्याच्या खुणा होत्या. त्या मार्गाने शोध घेतला असता, शेताबाहेर वासराला वन्यप्राण्याने खाल्ल्याचे दिसले तसेच वाघ दिसल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघाच्या चर्चेमुळे शेतकरी व मजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मजुरांनी शेतात कामावर येण्यास नकार दिल्याने शेतातील भाजीपाला कसा काढायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करून शेतकरी व गुराढोरांचा येणाऱ्या काळात जीव कसा वाचविता येईल. याकडे लक्ष देण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.

-------------