शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:45 IST

विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे.

गणेश वासनिक 

अमरावती - विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे. यासाठी वाघांनी नव्याने आश्रयस्थानासाठी छुपे ‘कॉरिडॉर’ निर्माण केल्यामुळे व्याघ्र संरक्षणाचा नवा पेच वनविभागापुढे उभा ठाकलेला आहे.

ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ पूर्वी अमरावती जिल्ह्यात येत नव्हते. मात्र, गेल्या २ वर्षांपासून या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे सहजरीत्या नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात दिसू लागले आहेत. पेंच येथून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ये-जा करीत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील विस्तीर्ण क्षेत्र आता वाघांना अपुरे पडत आहे. त्यामुळे वाघाने आता सावज नव्हे तर नवीन आश्रयस्थान (जंगल) शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे दोन्ही वाघ हे २५० कि.मी. अंतर लिलया पार करून जिल्ह्यात शिरले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघाने काटोल, कळमेश्र्वर, कोंढाळीमार्गे बोर अभयारण्यातून अमरावती जिल्ह्यात प्रवेश करून नवीन रस्ता तयार करीत आहे. विशेषत: वर्धा नदी ओलांडून हे दोन्ही वाघ अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात येताना दृष्टीस पडले आहे. व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वाघावर लक्ष नसल्याने नवीन आश्रयासाठी शेतात त्यांचा संचार सुरू आहे. ताडोब्यातून वाघ वरोरा तर गिरड, समुद्रपूर, उमरेड, कऱ्हाडला किंवा गोंदिया, भंडारात प्रवेश करून पळतात. पेंचमधून निघणारे वाघ हे वर्धा जिल्ह्यातील कोंढाळी, भारपीट, वाढोणा या कॉरिडॉरने अमरावती जिल्ह्यात पोहचत आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, पांढरकवडा या नवीन ‘कॉरिडॉर’ने येत असल्याचे वास्तव आहे.

व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ आवश्यक

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडणे आवश्यक झाले आहे. वाघांची वाढती संख्या आणि व्याघ्र प्रकल्पांचे अपुरे क्षेत्र ही देखील नवीन समस्या निर्माण झाली आहे. मेळघाट, ताडोबा, बोर, नवेगाव बांध, नागझिरा, पेंच या व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ अनिवार्य झाली आहे. हे पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडल्यास वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडणार नाही. मेळघाटातील वाघ अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे. पेंच, ताडोबा, बोर, नवेगाब -नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांतील वाघ बाहेर पडताहेत. अपुऱ्या क्षेत्रामुळे ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. साधारत: दरदिवशी २० कि.मी. चालणारा वाघ हल्ली ४० ते ५० कि.मी. चालत आहे. गत काही दिवसांपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी या भागात मुक्त संचार करणारा वाघ दरदिवसाला ५० कि.मी. अंतर पार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांना एकमेकांशी जोडण्याबातचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याकरिता मोठा निधी लागणार आहे. व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ झाल्यास वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचेदेखील संरक्षण करणे सोयीचे होईल व निसर्गाचे जतन करता येईल.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र 

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती