शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:45 IST

विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे.

गणेश वासनिक 

अमरावती - विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे. यासाठी वाघांनी नव्याने आश्रयस्थानासाठी छुपे ‘कॉरिडॉर’ निर्माण केल्यामुळे व्याघ्र संरक्षणाचा नवा पेच वनविभागापुढे उभा ठाकलेला आहे.

ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ पूर्वी अमरावती जिल्ह्यात येत नव्हते. मात्र, गेल्या २ वर्षांपासून या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे सहजरीत्या नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात दिसू लागले आहेत. पेंच येथून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ये-जा करीत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील विस्तीर्ण क्षेत्र आता वाघांना अपुरे पडत आहे. त्यामुळे वाघाने आता सावज नव्हे तर नवीन आश्रयस्थान (जंगल) शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे दोन्ही वाघ हे २५० कि.मी. अंतर लिलया पार करून जिल्ह्यात शिरले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघाने काटोल, कळमेश्र्वर, कोंढाळीमार्गे बोर अभयारण्यातून अमरावती जिल्ह्यात प्रवेश करून नवीन रस्ता तयार करीत आहे. विशेषत: वर्धा नदी ओलांडून हे दोन्ही वाघ अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात येताना दृष्टीस पडले आहे. व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वाघावर लक्ष नसल्याने नवीन आश्रयासाठी शेतात त्यांचा संचार सुरू आहे. ताडोब्यातून वाघ वरोरा तर गिरड, समुद्रपूर, उमरेड, कऱ्हाडला किंवा गोंदिया, भंडारात प्रवेश करून पळतात. पेंचमधून निघणारे वाघ हे वर्धा जिल्ह्यातील कोंढाळी, भारपीट, वाढोणा या कॉरिडॉरने अमरावती जिल्ह्यात पोहचत आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, पांढरकवडा या नवीन ‘कॉरिडॉर’ने येत असल्याचे वास्तव आहे.

व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ आवश्यक

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडणे आवश्यक झाले आहे. वाघांची वाढती संख्या आणि व्याघ्र प्रकल्पांचे अपुरे क्षेत्र ही देखील नवीन समस्या निर्माण झाली आहे. मेळघाट, ताडोबा, बोर, नवेगाव बांध, नागझिरा, पेंच या व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ अनिवार्य झाली आहे. हे पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडल्यास वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडणार नाही. मेळघाटातील वाघ अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे. पेंच, ताडोबा, बोर, नवेगाब -नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांतील वाघ बाहेर पडताहेत. अपुऱ्या क्षेत्रामुळे ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. साधारत: दरदिवशी २० कि.मी. चालणारा वाघ हल्ली ४० ते ५० कि.मी. चालत आहे. गत काही दिवसांपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी या भागात मुक्त संचार करणारा वाघ दरदिवसाला ५० कि.मी. अंतर पार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांना एकमेकांशी जोडण्याबातचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याकरिता मोठा निधी लागणार आहे. व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ झाल्यास वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचेदेखील संरक्षण करणे सोयीचे होईल व निसर्गाचे जतन करता येईल.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र 

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती