शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:45 IST

विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे.

गणेश वासनिक 

अमरावती - विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे. यासाठी वाघांनी नव्याने आश्रयस्थानासाठी छुपे ‘कॉरिडॉर’ निर्माण केल्यामुळे व्याघ्र संरक्षणाचा नवा पेच वनविभागापुढे उभा ठाकलेला आहे.

ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ पूर्वी अमरावती जिल्ह्यात येत नव्हते. मात्र, गेल्या २ वर्षांपासून या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे सहजरीत्या नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात दिसू लागले आहेत. पेंच येथून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ये-जा करीत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील विस्तीर्ण क्षेत्र आता वाघांना अपुरे पडत आहे. त्यामुळे वाघाने आता सावज नव्हे तर नवीन आश्रयस्थान (जंगल) शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे दोन्ही वाघ हे २५० कि.मी. अंतर लिलया पार करून जिल्ह्यात शिरले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघाने काटोल, कळमेश्र्वर, कोंढाळीमार्गे बोर अभयारण्यातून अमरावती जिल्ह्यात प्रवेश करून नवीन रस्ता तयार करीत आहे. विशेषत: वर्धा नदी ओलांडून हे दोन्ही वाघ अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात येताना दृष्टीस पडले आहे. व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वाघावर लक्ष नसल्याने नवीन आश्रयासाठी शेतात त्यांचा संचार सुरू आहे. ताडोब्यातून वाघ वरोरा तर गिरड, समुद्रपूर, उमरेड, कऱ्हाडला किंवा गोंदिया, भंडारात प्रवेश करून पळतात. पेंचमधून निघणारे वाघ हे वर्धा जिल्ह्यातील कोंढाळी, भारपीट, वाढोणा या कॉरिडॉरने अमरावती जिल्ह्यात पोहचत आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, पांढरकवडा या नवीन ‘कॉरिडॉर’ने येत असल्याचे वास्तव आहे.

व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ आवश्यक

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडणे आवश्यक झाले आहे. वाघांची वाढती संख्या आणि व्याघ्र प्रकल्पांचे अपुरे क्षेत्र ही देखील नवीन समस्या निर्माण झाली आहे. मेळघाट, ताडोबा, बोर, नवेगाव बांध, नागझिरा, पेंच या व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ अनिवार्य झाली आहे. हे पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडल्यास वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडणार नाही. मेळघाटातील वाघ अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे. पेंच, ताडोबा, बोर, नवेगाब -नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांतील वाघ बाहेर पडताहेत. अपुऱ्या क्षेत्रामुळे ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. साधारत: दरदिवशी २० कि.मी. चालणारा वाघ हल्ली ४० ते ५० कि.मी. चालत आहे. गत काही दिवसांपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी या भागात मुक्त संचार करणारा वाघ दरदिवसाला ५० कि.मी. अंतर पार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांना एकमेकांशी जोडण्याबातचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याकरिता मोठा निधी लागणार आहे. व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ झाल्यास वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचेदेखील संरक्षण करणे सोयीचे होईल व निसर्गाचे जतन करता येईल.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र 

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती