शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 17:45 IST

विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे.

गणेश वासनिक 

अमरावती - विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे. यासाठी वाघांनी नव्याने आश्रयस्थानासाठी छुपे ‘कॉरिडॉर’ निर्माण केल्यामुळे व्याघ्र संरक्षणाचा नवा पेच वनविभागापुढे उभा ठाकलेला आहे.

ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ पूर्वी अमरावती जिल्ह्यात येत नव्हते. मात्र, गेल्या २ वर्षांपासून या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे सहजरीत्या नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात दिसू लागले आहेत. पेंच येथून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ये-जा करीत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील विस्तीर्ण क्षेत्र आता वाघांना अपुरे पडत आहे. त्यामुळे वाघाने आता सावज नव्हे तर नवीन आश्रयस्थान (जंगल) शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे दोन्ही वाघ हे २५० कि.मी. अंतर लिलया पार करून जिल्ह्यात शिरले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघाने काटोल, कळमेश्र्वर, कोंढाळीमार्गे बोर अभयारण्यातून अमरावती जिल्ह्यात प्रवेश करून नवीन रस्ता तयार करीत आहे. विशेषत: वर्धा नदी ओलांडून हे दोन्ही वाघ अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात येताना दृष्टीस पडले आहे. व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वाघावर लक्ष नसल्याने नवीन आश्रयासाठी शेतात त्यांचा संचार सुरू आहे. ताडोब्यातून वाघ वरोरा तर गिरड, समुद्रपूर, उमरेड, कऱ्हाडला किंवा गोंदिया, भंडारात प्रवेश करून पळतात. पेंचमधून निघणारे वाघ हे वर्धा जिल्ह्यातील कोंढाळी, भारपीट, वाढोणा या कॉरिडॉरने अमरावती जिल्ह्यात पोहचत आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, पांढरकवडा या नवीन ‘कॉरिडॉर’ने येत असल्याचे वास्तव आहे.

व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ आवश्यक

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडणे आवश्यक झाले आहे. वाघांची वाढती संख्या आणि व्याघ्र प्रकल्पांचे अपुरे क्षेत्र ही देखील नवीन समस्या निर्माण झाली आहे. मेळघाट, ताडोबा, बोर, नवेगाव बांध, नागझिरा, पेंच या व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ अनिवार्य झाली आहे. हे पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडल्यास वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडणार नाही. मेळघाटातील वाघ अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे. पेंच, ताडोबा, बोर, नवेगाब -नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांतील वाघ बाहेर पडताहेत. अपुऱ्या क्षेत्रामुळे ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. साधारत: दरदिवशी २० कि.मी. चालणारा वाघ हल्ली ४० ते ५० कि.मी. चालत आहे. गत काही दिवसांपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी या भागात मुक्त संचार करणारा वाघ दरदिवसाला ५० कि.मी. अंतर पार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांना एकमेकांशी जोडण्याबातचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याकरिता मोठा निधी लागणार आहे. व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ झाल्यास वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचेदेखील संरक्षण करणे सोयीचे होईल व निसर्गाचे जतन करता येईल.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र 

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती