शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंघोळीसाठी धबधब्यात उतरणे बेतले 'त्या' तीन युवकांच्या जीवावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:45 IST

मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. एकमेकांच्या वाचविण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  

दीपक विनोद मिश्रा (१८, रा. गोपालनगर, अमरावती), आशिष कोटेचा (१९, रा. नवी वस्ती, बडनेरा) व विनय कुशवाह (रा. मसानगंज, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी या तिघांसह ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे हे सहा जण दुचाकीने अमरावती येथून धारखोऱ्याकडे गेले होते. त्यातील एकाचा पाय चिखलात शिरल्याने तो डोहात बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य दोघेसुद्धा बुडाले. ते बुडाल्याची माहिती ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे यांनी परतवाडा पोलिसांना गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास दिली. यातील दोघांनी थेट दुचाकीने परतवाडा पोलीस ठाणे गाठल्याची माहिती आहे. धारखोरा परिसरात मोबाईल रेंज नसल्याने हा परिसर संपर्कविहीन आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा आला.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तिघांचेही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तर मृतांच्या नातेवाइकांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. सर्व सहाजण एकमेकांचे हात धरून आंघोळीसाठी डोहात उतरले असल्याचा एक घटनाक्रम समोर आला आहे.मध्य प्रदेशातील बानूर ग्रामपंचायत अंतर्गत हा परिसर येत असून, घटनेची माहिती मिळताच परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परतवाडा ते धारणी मार्गावरून बुरडघाटहून जवळपास सात किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यात हा प्रसिद्ध धबधबा आहे.

टॅग्स :Deathमृत्यू