शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अंघोळीसाठी धबधब्यात उतरणे बेतले 'त्या' तीन युवकांच्या जीवावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:45 IST

मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. एकमेकांच्या वाचविण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  

दीपक विनोद मिश्रा (१८, रा. गोपालनगर, अमरावती), आशिष कोटेचा (१९, रा. नवी वस्ती, बडनेरा) व विनय कुशवाह (रा. मसानगंज, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी या तिघांसह ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे हे सहा जण दुचाकीने अमरावती येथून धारखोऱ्याकडे गेले होते. त्यातील एकाचा पाय चिखलात शिरल्याने तो डोहात बुडाला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य दोघेसुद्धा बुडाले. ते बुडाल्याची माहिती ऋषी मिश्रा, तुषार चौहान, कृष्णा उमरटे यांनी परतवाडा पोलिसांना गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास दिली. यातील दोघांनी थेट दुचाकीने परतवाडा पोलीस ठाणे गाठल्याची माहिती आहे. धारखोरा परिसरात मोबाईल रेंज नसल्याने हा परिसर संपर्कविहीन आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा आला.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तिघांचेही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तर मृतांच्या नातेवाइकांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. सर्व सहाजण एकमेकांचे हात धरून आंघोळीसाठी डोहात उतरले असल्याचा एक घटनाक्रम समोर आला आहे.मध्य प्रदेशातील बानूर ग्रामपंचायत अंतर्गत हा परिसर येत असून, घटनेची माहिती मिळताच परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परतवाडा ते धारणी मार्गावरून बुरडघाटहून जवळपास सात किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यात हा प्रसिद्ध धबधबा आहे.

टॅग्स :Deathमृत्यू