शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

‘रमाई’चे तीन हजार घरकुल लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST

वंचित, गरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जात आहेत. घरकुल बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावले जावे व त्यांच्या निवाºयाचा प्रश्न सुटावा, यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक लाभार्थींना घरकुल बांधकामाचे आदेश मिळाले आहेत.

ठळक मुद्देनिधीची वानवा : लाभार्थींना एकही हप्ता मिळाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २ हजार ९९५ घरकुलांचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सुमारे २ हजार ३८२ घरकुलांना मंजुरी प्रदान देण्यात आली आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही योजनेसाठी एक रुपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी घरकुलाची कामेही लॉकडाऊन झाली आहेत. स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाºया गरजूंना अपूर्ण असलेल्या घरांकडे हताशपणे पाहण्याची वेळ आली आहे.वंचित, गरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जात आहेत. घरकुल बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावले जावे व त्यांच्या निवाºयाचा प्रश्न सुटावा, यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक लाभार्थींना घरकुल बांधकामाचे आदेश मिळाले आहेत. यामुळे अनेकांनी नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेतले, तर काहींनी बँकांतून व्याजाने पैसे काढून घरकुलाचे काम सुरू केले. मात्र , रमाई आवास योजनेला शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्याने जिल्हाभरातील एकाही लाभार्थीला एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे अपूर्ण घराचे काम पूर्ण कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या योजनेचा निधी उपलब्ध झाला नसल्याने लाभार्थींचे घर बांधण्याचे स्वप्न हवेतच विरले असल्याचे चित्र जिल्ह्यातील १४ तालुक्यांत पाहावयास मिळत आहे.घर बांधकामाचा खर्च व साहित्याच्या किमतीत प्रत्येक दिवशी वाढ होत आहे. यामुळे रमाई आवास योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान अपुरे ठरते. ग्रामीण भागासाठी केवळ १ लाख २० हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते. त्यामध्ये प्रथम हप्ता ४० टक्के, दुसरा ४० टक्के व तिसरा ३० टक्के पंचायत समिती स्तरावरून वितरित करण्यात येतो. अनुदान मिळाले नसल्याने अनेक गावांत लाभार्थींच्या घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. काही घरांचे कामच सुरू झाले नाहीत. मागील दोन ते तीन वर्षांत जिल्हाभरातील तीन हजार घरांचे अनुदान शासनदरबारी लटकले आहेत. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे घर बांधण्याचे स्वप्न भंगले. अनेकांनी अनुदानासाठी संबंधित विभागाचे उंबरे झिजवले. रमाई आवास योजना ही सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्याची देखरेख केली जाते.अशी आहे योजनाग्रामीण व शहरी भागांमधील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांना त्यांच्या स्वत:च्या जागेवर किंवा कच्च्या घरांच्या ठिकाणी ३०० चौरस फुटाचे पक्के घर बांधण्यास आर्थिक मदत देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी १ लाख २० हजार रुपये, तर नागरी क्षेत्रातील २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते.तालुकानिहाय उदिष्टअचलपूर - ३४०, अमरावती -१८८, अंजनगाव सुर्जी - २२६, भातकुली - २८३, चांदूर रेल्वे - १८३, चांदूर बाजार - ३३०, चिखलदरा -८४, दर्यापूर - ३३७, धामणगाव रेल्वे - २०५, धारणी - ८७, मोर्शी - २००, नांदगाव खंडेश्वर - २००, तिवसा - १५८, वरूड - १७४ अशा २९९५ रमाई आवास योजनेचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे.रमाई घरकुल योजनेचे राहिलेले अनुदान मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- विनय ठमके, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना