शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:21 IST

पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे.

ठळक मुद्देआठवणींना उजाळा - वायुसेनेत अमरावतीची कामगिरी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. वायुसेनेसह अन्य सर्व सैन्यात जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील हजारो जवान कार्यरत आहेत, तर जिल्ह्यातील तीन सैनिकांना वीरचक्राने गौरविण्यात आले होते.१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने हल्ला चढविल्याने भारतीय सेनेतील ४२ जवान शहीद झाले होते. तदनंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजता वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे बारा तळ उद्ध्वस्त केले. भारत-चीन, भारत-पाकिस्तानमध्ये १९६२, १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या युद्धासह कारगिल युद्धात अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान आहे.तीन जवानांना वीरचक्रभारत-पाकिस्तान यांच्यातील युध्दात अमरावती जिल्ह्यातील जवानांची कामगिरी नेत्रदीपक आहे. सन १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात विंग कमांडर एस.एन. देशपांडे शहीद झाले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र देण्यात आले, तर १९७१ च्या भारत-पाक युद्धात वायुसेनेचे एअर कमांडर अरुणलाल देऊसकर यांना वीरचक्राने गौरविण्यात आले. सन १९४८ च्या भारत-पाक युद्धात शौर्य गाजविणारे सुभेदार पुंडलिक बकाराम बासुंदे यांना मरणोपरांत वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते.युद्धमोहिमेत १७ जवान शहीदसन १९६२ च्या भारत- चीनच्या युद्धात मराठा रेजिमेंटचे शिपाई मुरलीधर कळसाईत, सन १९७१ मधील युद्धात शंकर सांगोले, नागालँड आंतरिक सुरक्षा मोहिमेत शिपाई रामराव गेठे, श्रीलंकेतील ‘आॅपरेशन पवन’मध्ये लॉन्सनायक किशोर खांडेकर, १९९५ मधील ‘आॅपरेशन रक्षक’मध्ये ओंकार मासोदकर, १९९५ मधील आंतरिक सुरक्षा मोहीम त्रिपुरामध्ये प्रभाकर म्हसांगे, आॅपरेशन कारगिलमध्ये कृष्णा समरित, सन २००७ च्या आॅपरेशन रक्षकमध्ये लान्स दफ्तेदार प्रकाश धांडे, आसामच्या उल्फा उग्रवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायक सुनील चौहान, सन २००० मध्ये मणीलाल धांडे, १९६५ मधील भारत पाक युध्दात लान्सनायक गुलाबराव घडेकर व रावसाहेब मोहोड, अण्णासाहेब गोपाल राऊत व सुभेदार नत्थूजी खोब्रागडे व १९७१ च्या भारत पाक युद्धात विश्वनाथ वनवे असे १७ जवान शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या आॅपरेशन रक्षकमध्ये शिपाई पंजाबराव जानराव उईके शहीद झाले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला