शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:21 IST

पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे.

ठळक मुद्देआठवणींना उजाळा - वायुसेनेत अमरावतीची कामगिरी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. वायुसेनेसह अन्य सर्व सैन्यात जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील हजारो जवान कार्यरत आहेत, तर जिल्ह्यातील तीन सैनिकांना वीरचक्राने गौरविण्यात आले होते.१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने हल्ला चढविल्याने भारतीय सेनेतील ४२ जवान शहीद झाले होते. तदनंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजता वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे बारा तळ उद्ध्वस्त केले. भारत-चीन, भारत-पाकिस्तानमध्ये १९६२, १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या युद्धासह कारगिल युद्धात अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान आहे.तीन जवानांना वीरचक्रभारत-पाकिस्तान यांच्यातील युध्दात अमरावती जिल्ह्यातील जवानांची कामगिरी नेत्रदीपक आहे. सन १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात विंग कमांडर एस.एन. देशपांडे शहीद झाले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र देण्यात आले, तर १९७१ च्या भारत-पाक युद्धात वायुसेनेचे एअर कमांडर अरुणलाल देऊसकर यांना वीरचक्राने गौरविण्यात आले. सन १९४८ च्या भारत-पाक युद्धात शौर्य गाजविणारे सुभेदार पुंडलिक बकाराम बासुंदे यांना मरणोपरांत वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते.युद्धमोहिमेत १७ जवान शहीदसन १९६२ च्या भारत- चीनच्या युद्धात मराठा रेजिमेंटचे शिपाई मुरलीधर कळसाईत, सन १९७१ मधील युद्धात शंकर सांगोले, नागालँड आंतरिक सुरक्षा मोहिमेत शिपाई रामराव गेठे, श्रीलंकेतील ‘आॅपरेशन पवन’मध्ये लॉन्सनायक किशोर खांडेकर, १९९५ मधील ‘आॅपरेशन रक्षक’मध्ये ओंकार मासोदकर, १९९५ मधील आंतरिक सुरक्षा मोहीम त्रिपुरामध्ये प्रभाकर म्हसांगे, आॅपरेशन कारगिलमध्ये कृष्णा समरित, सन २००७ च्या आॅपरेशन रक्षकमध्ये लान्स दफ्तेदार प्रकाश धांडे, आसामच्या उल्फा उग्रवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायक सुनील चौहान, सन २००० मध्ये मणीलाल धांडे, १९६५ मधील भारत पाक युध्दात लान्सनायक गुलाबराव घडेकर व रावसाहेब मोहोड, अण्णासाहेब गोपाल राऊत व सुभेदार नत्थूजी खोब्रागडे व १९७१ च्या भारत पाक युद्धात विश्वनाथ वनवे असे १७ जवान शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या आॅपरेशन रक्षकमध्ये शिपाई पंजाबराव जानराव उईके शहीद झाले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला