शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:21 IST

पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे.

ठळक मुद्देआठवणींना उजाळा - वायुसेनेत अमरावतीची कामगिरी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवानांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. वायुसेनेसह अन्य सर्व सैन्यात जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील हजारो जवान कार्यरत आहेत, तर जिल्ह्यातील तीन सैनिकांना वीरचक्राने गौरविण्यात आले होते.१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने हल्ला चढविल्याने भारतीय सेनेतील ४२ जवान शहीद झाले होते. तदनंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजता वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे बारा तळ उद्ध्वस्त केले. भारत-चीन, भारत-पाकिस्तानमध्ये १९६२, १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या युद्धासह कारगिल युद्धात अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान आहे.तीन जवानांना वीरचक्रभारत-पाकिस्तान यांच्यातील युध्दात अमरावती जिल्ह्यातील जवानांची कामगिरी नेत्रदीपक आहे. सन १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात विंग कमांडर एस.एन. देशपांडे शहीद झाले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र देण्यात आले, तर १९७१ च्या भारत-पाक युद्धात वायुसेनेचे एअर कमांडर अरुणलाल देऊसकर यांना वीरचक्राने गौरविण्यात आले. सन १९४८ च्या भारत-पाक युद्धात शौर्य गाजविणारे सुभेदार पुंडलिक बकाराम बासुंदे यांना मरणोपरांत वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते.युद्धमोहिमेत १७ जवान शहीदसन १९६२ च्या भारत- चीनच्या युद्धात मराठा रेजिमेंटचे शिपाई मुरलीधर कळसाईत, सन १९७१ मधील युद्धात शंकर सांगोले, नागालँड आंतरिक सुरक्षा मोहिमेत शिपाई रामराव गेठे, श्रीलंकेतील ‘आॅपरेशन पवन’मध्ये लॉन्सनायक किशोर खांडेकर, १९९५ मधील ‘आॅपरेशन रक्षक’मध्ये ओंकार मासोदकर, १९९५ मधील आंतरिक सुरक्षा मोहीम त्रिपुरामध्ये प्रभाकर म्हसांगे, आॅपरेशन कारगिलमध्ये कृष्णा समरित, सन २००७ च्या आॅपरेशन रक्षकमध्ये लान्स दफ्तेदार प्रकाश धांडे, आसामच्या उल्फा उग्रवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायक सुनील चौहान, सन २००० मध्ये मणीलाल धांडे, १९६५ मधील भारत पाक युध्दात लान्सनायक गुलाबराव घडेकर व रावसाहेब मोहोड, अण्णासाहेब गोपाल राऊत व सुभेदार नत्थूजी खोब्रागडे व १९७१ च्या भारत पाक युद्धात विश्वनाथ वनवे असे १७ जवान शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या आॅपरेशन रक्षकमध्ये शिपाई पंजाबराव जानराव उईके शहीद झाले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला