शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रभात चौकातील ‘ती’ तीन दुकाने भूईसपाट; अतिक्रमण निर्मुलन पथकाची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: November 3, 2022 17:27 IST

महापालिकेने 'त्या' तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली

अमरावती : व्यवस्थापकासह चार मजुरांचा नाहक बळी घेणाऱ्या राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावरील तीनही दुकाने गुरूवारी जमीनदोस्त करण्यात आली. राजापेठ झोन व अतिक्रमण निर्मुलन पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. रविवारी दुपारी ती भीषण घटना घडल्यानंतर आयुक्तांनी सोमवारी लगेचच पाहणी करून खालची तीनही दुकाने खाली करून पाडण्याचे आदेश यंत्रणेला दिले होते. बरहुकूम गुरूवारी दुपारी लॉजखालील तीनही दुकानांवर जेसीबी चढविण्यात आला.

राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावर असलेल्या राजदीप बॅग एम्पोरियममध्ये डागडुजी सुरू असताना अचानक छत कोसळल्याने मलम्याखाली सहा जण दबले गेले. पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. लॉजचा पहिला व दुसरा माळा पाडण्यात आल्यानंतरही खालच्या राजदीप, शाहीन व आसाम टी कंपनी या पाच दुकानांवर त्याचा तसुभरही फरक पडला नव्हता. ती पाचही दुकाने अविरत सुरूच होती. मात्र, रविवारी दुपारी घात झाला.

राजदीप बॅग एम्पोरियममध्ये काम करणारे चार मजूर व व्यवस्थापक काय होते पाहून घेऊ, या प्रवृत्तीचे बळी ठरले. त्यानंतरही खालची तीन दुकाने खाली करून पाडण्यास संबंधितांनी सहजासहजी होकार दिला नाही. शाहीन पेन हाऊसच्या संचालकांनी सोमवारी होकार भरला होता. तर आसाम टी कंपनीच्या दोन्ही दुकानदारांनी केवळ दुकान बंद ठेवण्यास होकार भरला. मात्र, गुरूवारी अखेर महापालिकेने त्या तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली.

यांनी केली कार्यवाही

प्रभातचौकस्थित राजेंद्र लॉज खालील आसाम टी कंपनी, सोसायटी टी, शाहीन स्टेशनर्स ही तीनही दुकाने झोन क्र.२ व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाडण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशाने अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता अजय विंचूरकर, अतिक्रमण निरीक्षक शाम चावरे, योगेश कोल्हे, प्रसन्नजीत चव्हान, निरज तिवारी, शुभम पांडे, समीर शाह, सुनील यादव, गजानन संगोले, सागर काळे, शेख सलीम, अब्दुल रहीम, शहबाज खान, यश सांगोले यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाAmravatiअमरावती