शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

प्रभात चौकातील ‘ती’ तीन दुकाने भूईसपाट; अतिक्रमण निर्मुलन पथकाची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: November 3, 2022 17:27 IST

महापालिकेने 'त्या' तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली

अमरावती : व्यवस्थापकासह चार मजुरांचा नाहक बळी घेणाऱ्या राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावरील तीनही दुकाने गुरूवारी जमीनदोस्त करण्यात आली. राजापेठ झोन व अतिक्रमण निर्मुलन पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. रविवारी दुपारी ती भीषण घटना घडल्यानंतर आयुक्तांनी सोमवारी लगेचच पाहणी करून खालची तीनही दुकाने खाली करून पाडण्याचे आदेश यंत्रणेला दिले होते. बरहुकूम गुरूवारी दुपारी लॉजखालील तीनही दुकानांवर जेसीबी चढविण्यात आला.

राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावर असलेल्या राजदीप बॅग एम्पोरियममध्ये डागडुजी सुरू असताना अचानक छत कोसळल्याने मलम्याखाली सहा जण दबले गेले. पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. लॉजचा पहिला व दुसरा माळा पाडण्यात आल्यानंतरही खालच्या राजदीप, शाहीन व आसाम टी कंपनी या पाच दुकानांवर त्याचा तसुभरही फरक पडला नव्हता. ती पाचही दुकाने अविरत सुरूच होती. मात्र, रविवारी दुपारी घात झाला.

राजदीप बॅग एम्पोरियममध्ये काम करणारे चार मजूर व व्यवस्थापक काय होते पाहून घेऊ, या प्रवृत्तीचे बळी ठरले. त्यानंतरही खालची तीन दुकाने खाली करून पाडण्यास संबंधितांनी सहजासहजी होकार दिला नाही. शाहीन पेन हाऊसच्या संचालकांनी सोमवारी होकार भरला होता. तर आसाम टी कंपनीच्या दोन्ही दुकानदारांनी केवळ दुकान बंद ठेवण्यास होकार भरला. मात्र, गुरूवारी अखेर महापालिकेने त्या तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली.

यांनी केली कार्यवाही

प्रभातचौकस्थित राजेंद्र लॉज खालील आसाम टी कंपनी, सोसायटी टी, शाहीन स्टेशनर्स ही तीनही दुकाने झोन क्र.२ व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाडण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशाने अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता अजय विंचूरकर, अतिक्रमण निरीक्षक शाम चावरे, योगेश कोल्हे, प्रसन्नजीत चव्हान, निरज तिवारी, शुभम पांडे, समीर शाह, सुनील यादव, गजानन संगोले, सागर काळे, शेख सलीम, अब्दुल रहीम, शहबाज खान, यश सांगोले यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाAmravatiअमरावती