शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांसह तिघांचे नगरसेवकपद धोक्यात ?

By admin | Updated: May 19, 2016 00:07 IST

नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे.

आज निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणार चांदूरबाजार : नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे. प्रहार गटनेत्याकडून पक्षादेश झुगारल्याचा आरोप करण्यात आला असून आरोप सिध्द झाल्यास तिघांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.याबाबत जिल्हाधिकारी गुरूवार १९ मे रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांविरूध्द निर्णय दिल्यास त्यांना नगरसेवक पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यामुळे नांगलिया यांचे नगराध्यक्षपद देखील पणास लागले आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उत आला आहे. २९ आॅक्टोबर २०१५ रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपरोक्त तिघांनी प्रहार पक्षाचा पक्षादेश झुगारून अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उघड बंड पुकारले होते. यावेळी मनीषा नांगलिया या प्रहारच्या बंडखोर अध्यक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांना प्रहारचे तत्कालीन सदस्य, नगरसेवक तिरमारे व लंगोटे यांनी सहकार्य केले होते. त्यामुळे या तिघांनीही पक्षादेश (व्हीप) झुगारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.प्रहारच्या पराभूत अधिकृत उमेदवार सुनीता गणवीर व गटनेते अ.रहेमान शे.इब्राहिम यांनी या तिन्ही नगरसेवकांविरोधात तक्रार करून त्यांना नगरसेवकपदावरून निष्कासित करण्याचे अपील २९ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले होते. याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी दोन्ही पक्षांना गुरूवार १९ मे ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १८६५ मधील, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अटी व नियमांतर्गत कलम ७ नुसार हे अपील सादर करण्यात आले होते. अपिलावरील निर्णय तुर्तास तरी गुलदस्त्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बंडखोर प्रहार नगरसेवकांच्या विरोधात गेल्यास तो त्यांच्याकरीता जबरदस्त हादरा असेल. या प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी तो निर्णय तालुकाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे हे निश्चित.चांदूरबाजार शहर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ला आहे. येथील कुठलीही निवडणूक असो, ती जिल्ह्याच्या पटलावर गाजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे येथील नगराध्यक्षांवर केलेला आरोप कितपत सत्य आहे, हे येणारी वेळच सांगणार आहे. (तालुका प्रतिनिधी)