शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

नगराध्यक्षांसह तिघांचे नगरसेवकपद धोक्यात ?

By admin | Updated: May 19, 2016 00:07 IST

नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे.

आज निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणार चांदूरबाजार : नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा नांगलिया, नगरसेवक गोपाल तिरमारे, भय्या लंगोटे या तिघांचे नगरसेवक पद डावावर लागले आहे. प्रहार गटनेत्याकडून पक्षादेश झुगारल्याचा आरोप करण्यात आला असून आरोप सिध्द झाल्यास तिघांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.याबाबत जिल्हाधिकारी गुरूवार १९ मे रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांविरूध्द निर्णय दिल्यास त्यांना नगरसेवक पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यामुळे नांगलिया यांचे नगराध्यक्षपद देखील पणास लागले आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उत आला आहे. २९ आॅक्टोबर २०१५ रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपरोक्त तिघांनी प्रहार पक्षाचा पक्षादेश झुगारून अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उघड बंड पुकारले होते. यावेळी मनीषा नांगलिया या प्रहारच्या बंडखोर अध्यक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांना प्रहारचे तत्कालीन सदस्य, नगरसेवक तिरमारे व लंगोटे यांनी सहकार्य केले होते. त्यामुळे या तिघांनीही पक्षादेश (व्हीप) झुगारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.प्रहारच्या पराभूत अधिकृत उमेदवार सुनीता गणवीर व गटनेते अ.रहेमान शे.इब्राहिम यांनी या तिन्ही नगरसेवकांविरोधात तक्रार करून त्यांना नगरसेवकपदावरून निष्कासित करण्याचे अपील २९ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले होते. याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी दोन्ही पक्षांना गुरूवार १९ मे ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १८६५ मधील, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अटी व नियमांतर्गत कलम ७ नुसार हे अपील सादर करण्यात आले होते. अपिलावरील निर्णय तुर्तास तरी गुलदस्त्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बंडखोर प्रहार नगरसेवकांच्या विरोधात गेल्यास तो त्यांच्याकरीता जबरदस्त हादरा असेल. या प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी तो निर्णय तालुकाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे हे निश्चित.चांदूरबाजार शहर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ला आहे. येथील कुठलीही निवडणूक असो, ती जिल्ह्याच्या पटलावर गाजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे येथील नगराध्यक्षांवर केलेला आरोप कितपत सत्य आहे, हे येणारी वेळच सांगणार आहे. (तालुका प्रतिनिधी)