शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

अंजनगाव सुर्जी-परतवाडा मार्गावर तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देदाम्पत्याचा समावेश : बुधवारी रात्री अपघात, मुलगा अत्यवस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : परतवाडा येथून अंजनगाव सुर्जी$ला परत येणारे चारचाकी वाहन पुलाच्या कठड्यावर धडकल्याने पती, पत्नी व वाहनचालक हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास पांढरी खानमपूर स्मशानभूमीजवळ घडली.पोलीस सूत्रांनुसार, सुरेश भीमराव यावले (६३), शीला सुरेश यावले (६०) व वाहनचालक दीपक नळकांडे (३६, रा. सातेगाव) या तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. सुरेश यावले हे नातेवाइकांच्या एमएच २७ बीई ५८७२ या चारचाकी वाहनाने पत्नीच्या तपासणीकरिता नागपूर येथे गेले होते. सोबत त्यांचा मुलगा शुभम (२४) हासुद्धा होता. नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे हे बुधवारी रात्री या मार्गाने अंजनगावकडे येत असताना त्यांना अपघात घडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस व आरोग्य यंत्रणेला कळविले. पांढरी खानमपूर येथील युवा वर्गही मदतीसाठी धावला. मृतदेहांचे अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात