शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

चार वाहनांचा विचित्र अपघात; तीन ठार, १० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 10:44 IST

तीन दुचाकी, काळीपिवळी धडकली; आसेगावजवळची घटना

धामणगाव रेल्वे (अमरावती) : धामणगाव - यवतमाळ रस्त्यावरील आसेगावजवळ तीन दुचाकी व काळी पिवळीचा विचित्र अपघात झाला. मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात तीन जण ठार तर दहा जण जखमी झाले. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

स्वाती विजय मेश्राम (३०, रा. सुपलवाडा), अवि डहाके (२५, रा. भातकुली, सावंगी मेघे), प्रतीक मसराम (२७, रा. बोरगाव मेघे, वर्धा) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात आसेगाव ते जळकापटाचे दरम्यान शेंडे यांच्या शेताजवळ झाला. यवतमाळकडून धामणगावकडे येत असलेल्या काळी पिवळी वाहनावर मागून येत असलेली दुचाकी व समोरील दोन दुचाकी धडकल्या. या अपघातात स्वाती मेश्राम घटनास्थळी ठार झाल्या. तर, अवि डहाके व प्रतीक मसराम यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. काळी पिवळीमध्ये प्रवास करत असलेल्या सत्यभामा शामराव खडसे (५९, रा.धामणगाव), पौर्णिमा देविदास माहुरे (५७, अमरावती), प्रवीण भिसेन (२३, वर्धा), अनुसया मेश्राम (सुपलवाडा), शेख नूर (४५, रा. तळेगाव दशासर), विठ्ठल भलावी (५५, वाघोडा), पंचाबाई मेश्राम (४८, रा. सुपलवाडा), मनोज भाजीपाले यांच्यासह दहा जण गंभीर जखमी झाले.

त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना अमरावती व यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पवन शिंदे आणि अखिलेश पोळ यांनी जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधून माणुसकी जोपासत कार्यतत्परता दाखविली. दरम्यान तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, दत्तापूर येथील पोलिस चमू दाखल झाले.

सून जागीच ठार; तर दोन जावा गंभीर

मूळचे चांदुर रेल्वे तालुक्यातील सुपलवाडा येथील रहिवासी असलेले मेश्राम कुटुंब हे यवतमाळ जिल्ह्यातील नांदुरा येथे कामानिमित्त गेले होते. दरम्यान, काळीपिवळी वाहनात परत येत असतांना हा विचित्र अपघात घडला. या अपघातात काळीपिवळी उलटली. त्यात कुटुंबातील सून स्वाती मेश्राम ही वाहनाखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाली. तर त्याच कुटुंबातील दोन्ही जावा अनुसया मेश्राम व पंचाबाई मेश्राम या गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मोबाइल गिफ्ट घेण्यासाठी जाताना काळाची झडप

मित्राचा वाढदिवस असल्याने आपल्या मावशीच्या गावावरून एका मित्राला सोबत आणले. वाढदिवशी मित्राला मोबाइल गिफ्ट देणे ठरले आणि दोन मोटारसायकलवर धामणगावसाठी निघाले. या अपघातात दोघे जिवलग मित्र ठार झाले. काळी पिवळी मॅजिक व तीन मोटारसायकलमध्ये झालेल्या या अपघातात धामणगाव तालुक्यातील भातकुली येथील अविनाश बाबाराव डहाके (वय २८), बोरगाव मेघे येथील प्रतीक मसराम (२७) यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वी मृत्यू झाला. अविनाश हा आपल्या मावशीकडे बोरगाव मेघे येथे मिस्त्रीचे काम करत होता, तर प्रतीक हा देवळी येथे महालक्ष्मी कंपनीत कामाला होता. अविनाशच्या भातकुलीतील एका मित्राचा वाढदिवस असल्याने हे तिघेही धामणगाव रेल्वे येथे मोबाइल घेण्यासाठी आले होते. झालेल्या अपघातात दोघेही ठार झाले.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती