शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अमरावतीत विनयभंगाच्या तीन घटना; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 18:09 IST

अलीकडे अत्याचार, विनयभंग व मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देकुणाला पाठविली छायाचित्रे, तर कुणाच्या गर्लफ्रेंडकडून मार !

अमरावती : अलीकडे अत्याचार, विनयभंग व मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजमाध्यमांच्या आडून मुली, महिलांची छेड काढण्यासह त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या काही घटनादेखील पोलीस दप्तरी नोंदविण्यात आल्या आहेत. रस्त्यात अडवून छेड काढण्याचे, घरात शिरून विनयभंग करण्यात आल्याचे प्रकार घडत असताना महिलेचे फोटो तिच्याच पतीला पाठवून बदनामीचे प्रकारदेखील उजेडात आले आहेत.

माझ्यासोबत राहा, तुझी जबाबदारी घेतो

माझ्यासोबत राहा, तुझा पूर्ण खर्च करतो, असे म्हणत एका महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करण्यात आला. २५ जून रोजी पहाटे ६ च्या सुमारास ही घटना घडली. महिलेने नकार दिला असता तिला शिवीगाळ करण्यात आली. ती ओरडली असता, आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी २५ जून रोजी सकाळी ११.२४ च्या सुमारास अमोल देशमुख (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग व शिवीगाळीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वीदेखील आपण नोकरीवर जात असताना आरोपीने आपल्याला रस्त्यात अडविले तथा तुझा नातेवाईक तुझ्यासोबत राहत नाही, त्यामुळे तू माझ्यासोबत राहा, असे म्हटल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

‘ती’चे फोटो पतीला पाठविले

उसनवार घेतलेले पैसे देण्यासाठी मित्राकडे गेलेल्या व रात्रभर तेथेच थांबलेल्या तरुणाने मित्राच्या पत्नीसोबत काही छायाचित्रे काढली तथा ती तिच्या पतीच्या व्हॉट्सॲपवर पाठविल्याची घटना नवसारी भागात घडली. आरोपीने फिर्यादी महिलेलादेखील टेक्स्ट मेसेज केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २४ जून रोजी आरोपी प्रतीक चक्रनारायण (२०, रा. भीमनगर, ह.मु. बोरगाव मंजू) याच्याविरुद्ध विनयभंग व बदनामीचा गुन्हा दाखल केला. महिलेचा पती व आरोपी परस्परांच्या ओळखीचे आहेत. अशातच १५ जून रोजी प्रतीक नवसारीत पोहोचला. महिलेच्या पतीने रात्रीचे जेवण करू, उद्या जा, असे म्हटल्याने प्रतीक तेथे थांबला. त्या दिवशी रात्री महिला आपल्या घरी झोपली असताना आरोपीने तिच्यासोबत फोटो काढले. ते २२ जून रोजी तिच्यासह पतीला पाठविले.

आधी एकटीला सोडले, नंतर विनयभंग

एवढ्या रात्री मला एकटीला सोडून का गेला, असा जाब विचारणाऱ्या तरुणीचा तिच्याच मित्राकडून विनयभंग करण्यात आला. त्याच्या गर्लफ्रेंडने तिला मारहाण केली. भीमनगर परिसरात २४ जून रोजी रात्री १२ च्या सुमारास हा प्रसंग घडला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपी पलाश रायहोले व एका महिलेविरुद्ध २५ जून रोजी सकाळी गुन्हा दाखल केला. रहाटगावकडे जेवायला निघालेल्या पलाशला मध्येच त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. त्यामुळे तरुणीला तेथेच सोडून पलाश एकटाच भीमनगरला निघून आला. पाठोपाठ तरुणीदेखील भीमनगरात पोहोचली. तेथे तू येथे कशी काय आलीस व तू मला का सोडून आला, अशी परस्पर विचारणा करण्यात आली. मला दिसायचे नाही, अशी धमकीदेखील तिला देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावतीWomenमहिला