शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्ज आणि नापिकीला कंटाळून तीन युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 13:37 IST

नापिकी आणि कर्जामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अमरावती/ यवतमाळ : नापिकी आणि कर्जामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आयुष्य संपविले. अचलपूर तालुक्यातील दोनोडा खैरी येथील युवा शेतकरी सतीश कमलदास मोहोड याने (३३) रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सततची नापिकी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची आर्थिक ओढाताण सुरू होती. सतीश मोहोड यांच्याकडे तीन एकर शेती होती. धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथील शेतकरी मंगेश दिगंबर खातखिडे (४०) रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. 

वडिलोपार्जित चार एकर जमीन मोठा मुलगा मंगेश हा सांभाळत होता. यावर्षी अतिपावसामुळे शेतातील संपूर्ण पीक पाण्याखाली होते. त्याच्या पश्चात आई- वडील आणि एक भाऊ आहे. 

यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथील विजेश प्रेमसिंग आडे (३३) याने शेतात विष घेतले. ही घटना ८ ऑक्टोबरला रात्री उघडकीस आली. त्याला दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृताच्या आईच्या नावे तीन एकर शेती असून, सततच्या नापिकी, सोसायटीचे कर्ज आणि खासगी कर्जाला कंटाळून विजेशने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Deathमृत्यूagricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावतीYavatmalयवतमाळ