शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कर्ज आणि नापिकीला कंटाळून तीन युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 13:37 IST

नापिकी आणि कर्जामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अमरावती/ यवतमाळ : नापिकी आणि कर्जामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आयुष्य संपविले. अचलपूर तालुक्यातील दोनोडा खैरी येथील युवा शेतकरी सतीश कमलदास मोहोड याने (३३) रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सततची नापिकी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची आर्थिक ओढाताण सुरू होती. सतीश मोहोड यांच्याकडे तीन एकर शेती होती. धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथील शेतकरी मंगेश दिगंबर खातखिडे (४०) रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. 

वडिलोपार्जित चार एकर जमीन मोठा मुलगा मंगेश हा सांभाळत होता. यावर्षी अतिपावसामुळे शेतातील संपूर्ण पीक पाण्याखाली होते. त्याच्या पश्चात आई- वडील आणि एक भाऊ आहे. 

यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथील विजेश प्रेमसिंग आडे (३३) याने शेतात विष घेतले. ही घटना ८ ऑक्टोबरला रात्री उघडकीस आली. त्याला दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृताच्या आईच्या नावे तीन एकर शेती असून, सततच्या नापिकी, सोसायटीचे कर्ज आणि खासगी कर्जाला कंटाळून विजेशने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Deathमृत्यूagricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावतीYavatmalयवतमाळ